शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीतील ‘चाणक्य’ सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:51 IST

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांनंतर दिल्लीतील भाजप व काँग्रेसच्या ‘चाणक्यां’च्या हाती राजकारणाची सूत्रे गेली आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांनंतर दिल्लीतील भाजप व काँग्रेसच्या ‘चाणक्यां’च्या हाती राजकारणाची सूत्रे गेली आहेत. भाजपचे ‘चाणक्य’ असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकाँग्रेसचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे खासदार अहमद पटेल यांनी या राजकारणात थेट उडी घेतली आहे.भाजपचे चाणक्य अमित शहा आश्चर्यकारकरीतीने शांत राहिले आहेत. बहुधा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अमित शहा पुढाकार घेऊन भाजपची सत्ता स्थापन करतात; परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत अमित शहा यांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य मानले जात आहे. अखेर अमित शहा हा तटस्थपणा सोडून रविवारी दुपारी सक्रिय झाले. त्यांनी तात्काळ भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्रात पाठविले. अमित शहा मुंबईला गेले नाही, तर त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना मार्गदर्शन केले. पंधरा दिवसांत पहिल्यांदा अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात थेट दखल दिली आहे.काँग्रेस आमदारांचा दबावदुसरीकडे काँग्रेस या राजकीय खेळीत दूर राहण्याचा प्रयत्न करीत होते. सेनेच्या नेतृत्वातील सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिल्यास देशातील प्रतिमेवर काय परिणाम होईल, हा मुख्य प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींसमोर होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती; परंतु त्यानंतरही काँग्रेसची भूमिका सेनेसाठी सकारात्मक नसल्याचे स्पष्ट झाले होते. तसे संकेतही पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिले होते. दोन दिवसांमध्ये काँग्रेस आमदारांचा दबाव वाढल्याने काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांना बाहेर पडावे लागले. त्यांनी जयपूरला जाऊन काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केल्याने सोनिया गांधी यांचीही भूमिका सेनेबाबत मवाळ झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शहाAhmed Patelअहमद पटेल