शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Opinion Poll: भाजपाचीच 'दिवाळी'; तब्बल ४८ टक्के मतदारांचा कौल 'कमळा'ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 17:39 IST

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदारांचा धक्का

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मतदानाला अवघे दोन दिवस राहिल्यानं सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. याच पार्श्वभूमीवर एका सर्वेक्षणातून राज्यात भाजपाची सत्ता येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तब्बल ४८.८ टक्के मतदारांना भाजपाचीच सत्ता येईल, असं वाटतं. विशेष म्हणजे मतदारांना सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता अतिशय धूसर वाटते. एबीपी माझानं हे सर्वेक्षण केलं आहे.भाजपाला जवळपास निम्म्या मतदारांनी कौल दिलेला असताना शिवसेनेला केवळ ९ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. काँग्रेसची सत्ता येईल, असं मत १०.६ टक्क्यांनी व्यक्त केलं आहे. तर राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते, अशी शक्यता ११.३ टक्क्यांनी व्यक्त केली आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या व्यतिरिक्त इतरांची सत्ता येईल, असा अंदाज ११.३ टक्क्यांनी व्यक्त केला आहे. तर ८.९ टक्के मतदारांनी सांगता येत नाही, असं म्हणत यावर बोलण्यास नकार दिला आहे. भाजपाची सत्ता येईल, असं मत ४८ टक्के मतदारांनी व्यक्त असलं तरी ५४.५ टक्के मतदारांना मुख्यमंत्री बदलला जावं असं वाटतं. तर ४४.७ टक्के मतदारांनी मुख्यमंत्री बदलण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. राज्यातलं सरकार तातडीनं बदललं जावं, असं वाटणाऱ्या मतदारांचं प्रमाण ५५ टक्के इतकं आहे. तर सरकार बदलण्याची गरज नसल्याचं मत ४४.६ टक्के लोकांनी वर्तवलं आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस