शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन; पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे अडथळे होणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:19 IST

वाढवण बंदर येथे रोजगाराची नवी दालने, पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती

कणकवली : केंद्र सरकारने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण) स्थापन केले आहे. या समितीमुळे सिंधुदुर्गातील विकासाची रखडलेली कामे, प्रकल्प मार्गी लागणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.कणकवली येथे रविवारी पत्रकार परिषदेत मत्री राणे बोलत होते. ते म्हणाले, या प्राधीकरण स्थापन झाल्याने सीआरझेडचे निर्बंध शिथिल होऊन अनेक विकासकामे मार्गी लागतील. सार्वजनिक बांधकाम विभाग, पत्तन विभागांची अनेक निधीसह मंजूर असलेली कामे आता या समितीमुळे मार्गी लागणार आहेत. आमदार दीपक केसरकर यांचे स्वप्न असणारे शिरोड्यातील फाइव्ह स्टार हॉटेल आता लवकरच मार्गी लागेल.

ही कामे लागणार मार्गीप्राधीकरण नसल्याने अनेक विभागांचे जे काही प्रकल्प किंवा निधी रखडले होते .यात पत्तन विभागाची १८ कामे आहेत. १२२ कोटींचा निधी उपलब्ध आहे. अर्थसंकल्पीय ४२ कामे आहेत. त्यासाठी शंभर कोटी निधी आहे. सार्वजनिक बांधकामची जवळपास ५० कोटींची कामे प्रलंबित होती.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची जवळपास ५९ लाखांची कामे प्रलंबित आहेत. मालवण, वेंगुर्ला नगरपरिषद अशा अनेक ठिकाणी या सीआरझेडमुळे कामे अडकली आहेत. एमटीडीसीच्या जमिनी सीआरझेडच्या २०० मीटरच्यामध्ये येतात. तिथे तात्पुरते सर्व्हिस टेन्ट हाऊस, कोकणी हाऊस निर्माण करता येणार आहेत. गजबादेवी देवस्थान येथील विकास कामांना गती देता येणार आहे., असे मंत्री राणे म्हणाले.

वाढवण बंदर येथे रोजगाराची नवी दालनेपालघर जिल्ह्यात होत असलेल्या वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्गलाही होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होतील. त्यासाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्यात सिंधुदुर्गचा समावेश आहे. वाढवण बंदरात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिह्यातील आयटीआयमध्ये दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी राज्य सरकारने १२० कोटींचा निधी मंजूर केला आहे, असेही राणे यांनी सांगितले.

जिल्ह्याभरात सीसीटीव्हीचे जाळे तयार करणारविज वितरणच्या प्रलंबित कामांसाठी ७० कोटी, चिपी विमानतळ सुशोभीकरणासाठी १ कोटी दिले आहेत. जिल्ह्यात पोलिस दल सक्षम होण्यासाठी जिल्ह्याभरात सीसीटीव्हीचे जाळे तयार करणार आहोत, असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.