शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Cabinet Expansion: राजकीय वारसदारांची चांदी; मंत्रिमंडळ विस्तारात मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:44 IST

महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय नेत्यांच्या वारसदारांना संधी मिळाल्याने दिसून येते.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय नेत्यांच्या वारसदारांना संधी मिळाल्याने दिसून येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाल्याने इतिहासात पहिल्यांदाच एका मंत्रीमंडळात बाप-लेक दिसणार आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात विशिष्ठ राजकीय घराण्यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहेत. तीच परंपरा पुढेही चालू आहे. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेले अनेक तरुण चेहरे हे अशाच घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. ते सलग तीन वेळा लातूर (शहर) मतदारसंघातून निवडून आले असून यापूर्वी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव सतेज उर्फ बंटी पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येषठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळाले आहे. यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. यावेळी त्यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे, तसेच यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख यांनाही संधी मिळाली आहे. हे दोन्ही युवा नेते अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. प्राजक्र तनपुरे हे जयंत पाटील यांचे नातलग आहेत.भाजप नेते राधाकृष्ण विखे यांची तिहेरी कोंडीकाँग्रेसचे माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या तिकीटावर ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आता त्यांची अहमदनगर जिल्ह्यात तिहेरी कोंडी केली गेली आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे आणि शिवसेनेकडून शंकरराव गडाख या तीन नेत्यांना मंत्रीपदे दिली गेली आहेत. त्यामुळे विखेंची गडाख-थोरात-तनपुरे यांनी मोठी राजकीय कोंडी केली आहे.१३ जिल्हे राहिले मंत्रिपदापासून ‘वंचित’महाविकास आघाडी सरकारमध्ये विदर्भासह सर्व विभागांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न झाला असला तरी राज्यातील बारा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख असे दोन कॅबिनेट मंत्री होते. मात्र, या सरकारमध्ये सोलापूरच्या वाट्याला एकही मंत्रीपद आलेले नाही.काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत होते. मात्र ऐनवेळी ते मागे पडले. उस्मानाबादमधून तानाजी सावंत (शिवसेना) यांचेही नाव चर्चेत होते. मात्र त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झाले. पूर्व विदर्भातील अकोला, वाशिम या जिल्ह्यांना मंत्रीपद मिळाले नाही. पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार असताना एकालाही संधी मिळाली नाही. त्यामुळे संग्राम थोपटे नाराज झाले आहेत.मंत्रिमंडळात वंचित राहिलेले जिल्हे असे- पालघर, सोलापूर, गोंदिया, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अकोला, वर्धा, धुळे, वाशिम, गडचिरोली आणि भंडारा.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAshok Chavanअशोक चव्हाणAditi Tatkareअदिती तटकरेVishwajeet Kadamविश्वजीत कदमAmit Deshmukhअमित देशमुखSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील