शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

९०० बालगृहांच्या मुळावरच घाव, तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे पालन बंधनकारक

By यदू जोशी | Updated: April 5, 2018 05:52 IST

अनुदानाअभावी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या राज्यातील ९०० स्वयंसेवी बालगृहांच्या थेट मुळावरच घाव घालणारा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू करीत तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक केल्याने बालगृहचालकांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 मुंबई - अनुदानाअभावी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या राज्यातील ९०० स्वयंसेवी बालगृहांच्या थेट मुळावरच घाव घालणारा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू करीत तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक केल्याने बालगृहचालकांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.राज्य शासनाने अलीकडेच राजपत्र जाहीर करून केंद्रीय बाल न्याय अधिनियमाचा आधार घेत महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू केला आहे. बाल न्याय अधिनियमात राज्यांना या अधिनियमाची अंमलबजावणी सुसह्य करण्यासाठी जनतेचे आक्षेप मागवून काही दुरुस्त्या करून नियम बनविण्याचे अधिकार बहाल केले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने डिसेंबर २०१७मध्ये हरकती मागविल्या. त्यानुसार, बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही आक्षेपही नोंदविले. मात्र, त्याची दखल न घेता व कोणताही बदल न करता राज्य शासनाने केंद्रीय बाल न्याय आदर्श नियमावली २०१७चा मराठी अनुवाद करून विधी व न्याय विभागाची मान्यता घेऊन राजपत्राद्वारे राज्यात लागू केले.वास्तविक, सदरचा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ अलीकडच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ मार्चला विधिमंडळात चर्चेला येणार असल्याचे कार्यक्रम पत्रिकेत असताना तत्पूर्वीच म्हणजे १४ मार्चला तो राजपत्र काढून लागू करण्यामागची सरकारची भूमिका संशयास्पद ठरते, असे बालगृहचालकांचे म्हणणे आहे. दहा आमदारांनी जरी सभागृहात या विधेयकाला विरोध केला असता तरी जाचक नियमांमध्ये बदल होऊ शकला असता. २८ मार्चला दोन्ही सभागृहांत चर्चा न होताच हे विधेयक मंजूर झाले होते.जाचक नियमांची सरबत्तीया नियमावलीतील कलमानुसार बालगृहांसाठी कर्मचारी आकृतिबंध निश्चित करण्यात आला असून ५० मुलांसाठी ३० कर्मचारी व कलम ३१ (२)नुसार बालकांच्या निवासासाठी तब्बल ८ हजार चौरस फूट जागेची इमारत बंधनकारक केले आहे. याशिवाय नियमावलीतील कलम ३२नुसार मुलांना गादी, पलंग, उशी, लोकरीची शाल, ब्लँकेट, चादर, बेडशिट, मच्छरदाणी, लोकराचे जॅकेट, चप्पल, स्पोर्ट्स शूज, स्कूल शूज, ड्रेस, शाम्पू, कोल्ड क्रीम, सुगंधी तेल, टॉवेल्स, अंतरवस्त्र, रंगीत कपडे आदी देण्याची अट घातली आहे. कलम ३५नुसार जेवणात कोंबडीचे मटण, अंडी, पनीर, दही, लोणी, सलाड आदी व नाश्त्यात सकाळी ७.३०ला दूध, उपमा, मिसळ-पाव तर सायंकाळी ४ वाजता चहा, कॉफी, सँडविच, इडली असा आहार अपेक्षित आहे.पन्नास मुलांमागे तीस कर्मचाºयांची अपेक्षा करणाºया या नियमावलीत त्या कर्मचाºयांच्या वेतनाची व आठ हजार चौरस फुटांतील इमारतीला लागणाºया भाड्याचा कुठेच साधा उल्लेख नाही. चमचमीत जेवण देण्याची अट घालताना त्यासाठी दरमहा प्रति बालक पाच ते सहा हजार रुपये भोजन अनुदानाची तरतूद करण्याचा सोईस्कर विसर नियमावली तयार करणाºयांना पडलेला दिसतो, अशी खोचक टीका संस्थाचालकांनी केली.हा तर तुघलकी प्रकारबाल कल्याण क्षेत्रात काम करणाºयांच्या किंवा सर्वसामान्यांच्या आक्षेप व हरकतींची दखल न घेता सभागृहात चर्चेविनाच ही नियमावली मंजूर करणे म्हणजे बालगृहांच्या मुळावर घाव घालण्याचा तुघलकी प्रकार आहे.- रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्लेषक

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार