शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

९०० बालगृहांच्या मुळावरच घाव, तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे पालन बंधनकारक

By यदू जोशी | Updated: April 5, 2018 05:52 IST

अनुदानाअभावी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या राज्यातील ९०० स्वयंसेवी बालगृहांच्या थेट मुळावरच घाव घालणारा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू करीत तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक केल्याने बालगृहचालकांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 मुंबई - अनुदानाअभावी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या राज्यातील ९०० स्वयंसेवी बालगृहांच्या थेट मुळावरच घाव घालणारा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू करीत तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक केल्याने बालगृहचालकांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.राज्य शासनाने अलीकडेच राजपत्र जाहीर करून केंद्रीय बाल न्याय अधिनियमाचा आधार घेत महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू केला आहे. बाल न्याय अधिनियमात राज्यांना या अधिनियमाची अंमलबजावणी सुसह्य करण्यासाठी जनतेचे आक्षेप मागवून काही दुरुस्त्या करून नियम बनविण्याचे अधिकार बहाल केले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने डिसेंबर २०१७मध्ये हरकती मागविल्या. त्यानुसार, बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही आक्षेपही नोंदविले. मात्र, त्याची दखल न घेता व कोणताही बदल न करता राज्य शासनाने केंद्रीय बाल न्याय आदर्श नियमावली २०१७चा मराठी अनुवाद करून विधी व न्याय विभागाची मान्यता घेऊन राजपत्राद्वारे राज्यात लागू केले.वास्तविक, सदरचा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ अलीकडच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ मार्चला विधिमंडळात चर्चेला येणार असल्याचे कार्यक्रम पत्रिकेत असताना तत्पूर्वीच म्हणजे १४ मार्चला तो राजपत्र काढून लागू करण्यामागची सरकारची भूमिका संशयास्पद ठरते, असे बालगृहचालकांचे म्हणणे आहे. दहा आमदारांनी जरी सभागृहात या विधेयकाला विरोध केला असता तरी जाचक नियमांमध्ये बदल होऊ शकला असता. २८ मार्चला दोन्ही सभागृहांत चर्चा न होताच हे विधेयक मंजूर झाले होते.जाचक नियमांची सरबत्तीया नियमावलीतील कलमानुसार बालगृहांसाठी कर्मचारी आकृतिबंध निश्चित करण्यात आला असून ५० मुलांसाठी ३० कर्मचारी व कलम ३१ (२)नुसार बालकांच्या निवासासाठी तब्बल ८ हजार चौरस फूट जागेची इमारत बंधनकारक केले आहे. याशिवाय नियमावलीतील कलम ३२नुसार मुलांना गादी, पलंग, उशी, लोकरीची शाल, ब्लँकेट, चादर, बेडशिट, मच्छरदाणी, लोकराचे जॅकेट, चप्पल, स्पोर्ट्स शूज, स्कूल शूज, ड्रेस, शाम्पू, कोल्ड क्रीम, सुगंधी तेल, टॉवेल्स, अंतरवस्त्र, रंगीत कपडे आदी देण्याची अट घातली आहे. कलम ३५नुसार जेवणात कोंबडीचे मटण, अंडी, पनीर, दही, लोणी, सलाड आदी व नाश्त्यात सकाळी ७.३०ला दूध, उपमा, मिसळ-पाव तर सायंकाळी ४ वाजता चहा, कॉफी, सँडविच, इडली असा आहार अपेक्षित आहे.पन्नास मुलांमागे तीस कर्मचाºयांची अपेक्षा करणाºया या नियमावलीत त्या कर्मचाºयांच्या वेतनाची व आठ हजार चौरस फुटांतील इमारतीला लागणाºया भाड्याचा कुठेच साधा उल्लेख नाही. चमचमीत जेवण देण्याची अट घालताना त्यासाठी दरमहा प्रति बालक पाच ते सहा हजार रुपये भोजन अनुदानाची तरतूद करण्याचा सोईस्कर विसर नियमावली तयार करणाºयांना पडलेला दिसतो, अशी खोचक टीका संस्थाचालकांनी केली.हा तर तुघलकी प्रकारबाल कल्याण क्षेत्रात काम करणाºयांच्या किंवा सर्वसामान्यांच्या आक्षेप व हरकतींची दखल न घेता सभागृहात चर्चेविनाच ही नियमावली मंजूर करणे म्हणजे बालगृहांच्या मुळावर घाव घालण्याचा तुघलकी प्रकार आहे.- रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्लेषक

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार