शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 00:05 IST

Supriya Sule Interview: शरद पवारांना पर्याय नव्हता हे सांगणे किती हास्यास्पद आहे. त्या माणसाने ८० व्या वर्षी पक्ष काढला आणि लढतोय, असे म्हटले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते, दुसऱ्याला केले असते तर काहीच झाले नसते. पण शरद पवारांचे अजित पवारांवर प्रेम होते, असे सुळे यांनी स्पष्ट केले. 

अजित पवार माझ्याशी बोलत नाहीत. अजित पवार सांगतात की त्यांना व्हिलन बनविले गेले, मग त्याच अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री पद दिले गेले, एवढे लाड पुरविले गेले. माझी खूप इच्छा आहे अजित पवारांना प्रश्न विचारण्याची परंतू ते बोलतच नाहीत, त्यामुळे मला हा प्रश्न विचारता येणार नाही, असे सुळे म्हणाल्या. तसेच विधानसभेला पवारांच्याच कुटुंबातील उमेदवार का दिला, या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली ते सांगितले. 

मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...

लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे बोलत होत्या. अजित पवारांकडे पर्याय नव्हता, म्हणून ४० आमदार त्यांच्यासोबत गेले या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की शरद पवारांना पर्याय नव्हता हे सांगणे किती हास्यास्पद आहे. त्या माणसाने ८० व्या वर्षी पक्ष काढला आणि लढतोय, असे म्हटले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते, दुसऱ्याला केले असते तर काहीच झाले नसते. पण शरद पवारांचे अजित पवारांवर प्रेम होते, असे सुळे यांनी स्पष्ट केले. 

युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली यावर सुळे म्हणाल्या की, बारामतीतून कोणी ती जबाबदारी घेतली नाही. मला आनंद झाला असता जर कोणी ती घेतली असती तर. परंतू बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही. युगेंद्र दीड वर्षांपासून काम करत होता. यामुळे त्याला उमेदवारी देण्यात आल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात मी लढले ती काही कौटुंबिक लढाई नव्हती ती वैचारिक लढाई होती, असे सुळे यांनी स्पष्ट केले. 

विधानसभेचे उमेदवार निवडताना इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीशी काही समस्या नाही हा निकष लावल्याचे सुळे यांनी सांगितले. शरद पवार भाजपासोबत जायचे असते तर कधीच गेले असते. कोणी थांबवले असते, असा सवाल सुळे यांनी सध्या होत असलेल्या चर्चांवर केला. जागावाटपातील वादावरून कटुता टाळता आली असती का या प्रश्नावर सुळे यांनी सांगितले की एवढ्या मोठ्या आघाडीत लोकशाही होती. जे आमच्याकडे झाले ते त्यांच्याकडेही झाले. अदृश्य शक्तीने एवढे पक्ष निर्माण केलेत तो गढूळपणा कुठेतरी खाली बसायला लागेल, असे सुळे म्हणाल्या. 

जयंत पाटील, रोहित पवारांमध्ये सुप्त संघर्ष?जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त संघर्ष आहे का या प्रश्नावर त्यांच्यात जनरेशन गॅप आहे. यामुळे त्यांच्याच वाद कसा असू शकतो. मी संघटनेत काम करते. मी आत्या घरी, मी त्यांना रोहित पवार म्हणूनच पाहते. नाते पाहून हळवे झालो तर लीडरम्हणून चुकीचे ठरेल. लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायला हवे, असे सुळे यांनी सांगितले. 

यंदाची विधानसभा ही राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी नाही तर महायती विरोधात महाविकास आघाडी अशी लढाई आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेची शेवटची यादी ही भाजपाचे लोकांची आहे. भाजपा जवळपास १७५ जागा लढतेय, असे सुळे म्हणाल्या. गेल्या काही वर्षांत सगळेच सत्ताधारी झाले सगळेच विरोधक झाले यावर जनता स्पष्ट बहुमत देणारे मतदान करेल असा अंदाज सुळे यांनी व्यक्त केला. 

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर मला ज्यांच्याकडून अपेक्षा नाहीत त्यांच्याकडून वाईट वाटत नाही. पण भाजपाचे वाईट वाटते. भाजपाचे विरोधक असले तरी सुसंस्कृत होते. ओरिजिनल भाजपा सुसंस्कृत आहे. फडणवीस मुळचे भाजपाचे. भाजपा २.० ही वाईट आहे, असे सुळे यांनी मत व्यक्त केले. फडणवीसाकडून खूप अपेक्षा होत्या. खोत बोलले तेव्हा ते व्यासपीठावर होते, ते काही बोलले नाहीत याचे वाईट वाटते, असे सुळे म्हणाल्या.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेyugendra pawarयुगेंद्र पवारRohit Pawarरोहित पवारJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४