शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 19:55 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केले?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली असून, राज्यभर दौरे करत प्रचारसभा घेत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार शरद पवार व्यक्त करत आहेत. यातच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपा सरकारवर टीका केली आहे. 

एका प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री दौरे करत आहेत. आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी १० वर्षांचा हिशोब दिला पाहिजे. गेल्या १० वर्षांपासून सत्ता आहे आणि ते आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केले? महाराष्ट्रामध्ये ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. केंद्रात आमचे सरकार असताना आम्ही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले, असा दावा शरद पवार यांनी यावेळी बोलताना केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा

राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज माफी देणार आहोत. जो नियमित कर्ज भरेल त्यांना ५० हजाराचे अनुदान देणार आहोत. शेती अवजारांवरील GST बंद करणार आहोत. राज्यात गुंडगिरी वाढली आहे. नवीन उद्योगधंदे यायला तयार नाहीत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

दरम्यान, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी कष्ट घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काय होते, हे कळत नव्हते. त्यांनी लोकसभेला ४०० पारचा नारा दिला. लोक हुशार होते. लोकांना कळले की देशाची घटना बदलायची आहे म्हणून त्यांना ४०० पार हवे होते. त्यांनी हा डाव हाणून पाडला. गेल्या १० वर्षांपासून मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि ते प्रश्न शरद पवारांना विचारतात. शरद पवारांनी एवढेच केले की, तुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस