शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 18:07 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: लोकसभेला भाजपाबाबत तीव्र नाराजी जनतेच्या मनात होती. अचानक एवढा बदल होऊन भाजप महायुतीबद्दल इतका विश्वास संपादन करणे, अशक्य आणि अविश्वसनीय आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा झाला तरीही महायुतीकडून मुख्यमंत्री कोण होणार, सत्ता कधी स्थापन करणार, याबाबत स्पष्टता दिसत नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. तसेच ईव्हीएमविरोधातील लढाई तीव्र केली आहे. यातच आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. 

केंद्रीय निवडणूक आयोगाला स्वायत्तता आहे. मुक्त वातावरणात पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या आहेत, असा निर्वाळा दिला जात असला, तरी जनतेच्या मनात मतदान यंत्रांबाबत शंका आहे. मग, सर्व मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीला किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याला सरकार का घाबरते, असा सवाल करत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठराविक मतदान यंत्रांतील मतचिठ्ठ्यांची तपासणी झाली, तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण, ठराविक मतदान यंत्रांमधील डेटा नष्ट केला जाऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले

यंदाची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. त्यामुळे त्यांना फसवले जाणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे फसवले गेले असल्याचे दिसून येत आहे. राज्यात २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना उद्धव ठाकरे यांना फसवले, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांना फसविले आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणुकीत पैशाचा वापर, सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही नष्ट केली आहे. सत्तेचा गैरवापर करून पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटण्यात आले. निवडणूक आयोग याबाबत शांत राहिला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

दरम्यान, कोणत्याही निवडणुकीत जनतेचा विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, मतदान यंत्राबाबत जनतेचा विश्वास राहिलेला नाही. पुन्हा मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) निवडणुकांकडे जाण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्रातील भाजपा सरकारबद्दल तीव्र नाराजी दाखवून दिली. मात्र, पुढील चार महिन्यांच्या कालावधीत अचानक मतदारांच्या मनात एवढा बदल होऊन भाजप महायुती सरकारबद्दल इतका विश्वास संपादन करणे, अशक्य आणि अविश्वसनीय आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे