शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

“बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 18:07 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: बाळासाहेब ठाकरे यांच्या मुद्द्याला हात घालून पंतप्रधान मोदी यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे सांगितले जात असून, काँग्रेस या आव्हानावर काय प्रतिक्रिया देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:बाळासाहेब ठाकरे यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अतुलनीय योगदान आहे. परंतु, काँग्रेस नेत्यांच्या तोंडून बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कौतुकाचा एकही शब्द बाहेर येत नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला. तसेच शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मान्य करण्याचे आव्हान केले. महाराष्ट्रातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील असामान्य योगदानाबाबत अनेक गोष्टी नमूद केल्या.

महाविकास आघाडीतील काँग्रेस मित्रांना आव्हान देतो की, काँग्रेसच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करावे आणि त्यांच्या विचारधारेला, विचारसरणीला मान्यता द्यावी. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबाबत काँग्रेसचे नेते आजपर्यंत मौन बाळगून आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचे भान राखणारे विचार मांडले. जे काँग्रेसच्या विचारसरणीपासून बऱ्याच बाबतीत वेगळे आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चर्चेत येऊ शकतात 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चर्चेत येऊ शकतात. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला मविआतील सहकारी आणि घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांचे महत्त्व मान्य करण्यास सांगण्याचे दिलेल्या आव्हानाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला आव्हान आणि मविआमधील ऐक्य टिकवण्याची कसोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे विधान, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षाच्या विचारांची विसंगती स्पष्टपणे मांडणारे असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीने काँग्रेसने ठाकरे गटाच्या विचारांशी जुळवून घेतले तर, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने भाजपा सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली असली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याच्या दृष्टीने कसोटीचे ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, या वक्तव्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नसली तरी काँग्रेसमधील अन्य काही नेत्यांनी ठाकरे गटासोबतच्या विचारसरणीतील फरक मान्य केल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचे कौतुक न करण्याबाबत काँग्रेसच्या मौनावर पंतप्रधान मोदींनी बोट ठेवून महाराष्ट्राच्या मतदारांसमोर काँग्रेसची दुटप्पी प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या वारशाचा मुद्दा कायमच उचलून धरला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेससाठी एक आव्हान निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मान्यता देण्यास काँग्रेस तयार होते का आणि या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील ऐक्य टिकून राहते का, याकडे राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण