शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

“बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 18:07 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: बाळासाहेब ठाकरे यांच्या मुद्द्याला हात घालून पंतप्रधान मोदी यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे सांगितले जात असून, काँग्रेस या आव्हानावर काय प्रतिक्रिया देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:बाळासाहेब ठाकरे यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अतुलनीय योगदान आहे. परंतु, काँग्रेस नेत्यांच्या तोंडून बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कौतुकाचा एकही शब्द बाहेर येत नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला. तसेच शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मान्य करण्याचे आव्हान केले. महाराष्ट्रातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील असामान्य योगदानाबाबत अनेक गोष्टी नमूद केल्या.

महाविकास आघाडीतील काँग्रेस मित्रांना आव्हान देतो की, काँग्रेसच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करावे आणि त्यांच्या विचारधारेला, विचारसरणीला मान्यता द्यावी. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबाबत काँग्रेसचे नेते आजपर्यंत मौन बाळगून आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचे भान राखणारे विचार मांडले. जे काँग्रेसच्या विचारसरणीपासून बऱ्याच बाबतीत वेगळे आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चर्चेत येऊ शकतात 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चर्चेत येऊ शकतात. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला मविआतील सहकारी आणि घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांचे महत्त्व मान्य करण्यास सांगण्याचे दिलेल्या आव्हानाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला आव्हान आणि मविआमधील ऐक्य टिकवण्याची कसोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे विधान, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षाच्या विचारांची विसंगती स्पष्टपणे मांडणारे असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीने काँग्रेसने ठाकरे गटाच्या विचारांशी जुळवून घेतले तर, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने भाजपा सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली असली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याच्या दृष्टीने कसोटीचे ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, या वक्तव्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नसली तरी काँग्रेसमधील अन्य काही नेत्यांनी ठाकरे गटासोबतच्या विचारसरणीतील फरक मान्य केल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचे कौतुक न करण्याबाबत काँग्रेसच्या मौनावर पंतप्रधान मोदींनी बोट ठेवून महाराष्ट्राच्या मतदारांसमोर काँग्रेसची दुटप्पी प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या वारशाचा मुद्दा कायमच उचलून धरला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेससाठी एक आव्हान निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मान्यता देण्यास काँग्रेस तयार होते का आणि या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील ऐक्य टिकून राहते का, याकडे राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण