शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 08:39 IST

दोन्ही आघाड्यांमध्ये तीन-तीन पक्ष आहेत. २०१४ ला आपापली ताकद आजमावण्यासाठी चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. यावेळी चारही पक्षांच्या नेत्यांना लढण्याची संधी मिळाली होती.

लोकसभेत जागावाटपात आघाडी घेतलेल्या मविआमध्ये उशिरा का होईना अखेर विधानसभेचे जागावाटप झाले आहे. महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी पहायला मिळत आहे. दोन्ही गटात विभिन्न विचारधारेचे, नेहमी एकमेकांना पाण्यात पाहणारे पक्ष एकत्र आलेले आहेत. यामुळे वरच्या पातळीवरच नाही तर स्थानिक पातळीवरही म्हणावे तसे मनोमिलन झालेले नाही. याचा परिणाम जागावाटपाचा वाद, जागावाटपानंतर बंडखोरीच्या पवित्र्यात झाले आहे. लोकसभेला सांगली पॅटर्न खूप गाजला होता. तशीच बंडखोरी आता नाशिक मध्यमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दोन्ही आघाड्यांमध्ये तीन-तीन पक्ष आहेत. २०१४ ला आपापली ताकद आजमावण्यासाठी चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. यावेळी चारही पक्षांच्या नेत्यांना लढण्याची संधी मिळाली होती. २०१९ मध्ये पुन्हा युती-आघाडी झाली व पुन्हा दोन उमेदवार झाले. यानंतर झालेल्या राजकारणात दोन पक्षांची चार शकले झाली आणि दोन्ही गटात तीन तीन पक्ष निर्माण झाले. यामुळे प्रत्येक मतदारसंघात किमान सहा इच्छूक निर्माण झाले. या इच्छुकांनी काही वर्षे तयारीही केली होती. जागावाटपात आपल्या पक्षाच्या पदरात जागा पाडून घेण्यासाठी फिल्डिंगही लावली गेली. शक्तीप्रदर्शन, नाराजी, बॅनरबाजी आदी मार्ग अवलंबिण्यात आले. परंतू, सहापैकी दोघांनाच संधी मिळाल्याने उर्वरित नाराज झाले आहेत. 

एवढी तयारी केलेली, आपल्यासोबतच कार्यकर्त्यांचा हिरमोड कसा करणार या विचारातून हे इच्छुक बंडखोरीच्या वाटेवर वळू लागले आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राहुल दिवे नाराज झाले असून काँग्रेस येत्या दोन दिवसांत निर्धार मेळावा घेणार आहे. लोकसभेला सांगलीत जरा ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात बंड करून काँग्रेसने निवडणूक जिंकली होती, तसाच पॅटर्न नाशिक मध्यमध्ये राबविला जाणार आहे. 

काँग्रेसचे राहुल दिवे यांनी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर राहुल दिवे यांनी बंडाचा इशारा दिला असून यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत गीते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताशांचा गजरात वसंत गीते यांचा स्वागत करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी टाकली आहे ती विजय स्वरूपात त्यांना दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी वसंत गीते यांनी दिली आहे .

टॅग्स :congressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाnashik-central-acनाशिक मध्यmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४