शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

काँग्रेस-भाजपची ७६ जागांवर थेट लढत; विदर्भ पॅटर्न पुढच्या सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 19:55 IST

भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणाऱ्या या ७६ जागा राज्यातील पुढील सरकार स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी ७६ जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार आहे. दोन्ही पक्ष अनुक्रमे सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी आघाडीचे नेतृत्व करत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये ६६ जागांवर लढत झाली होती, त्यापैकी काँग्रेसने १६ तर भाजपने ५० जागा जिंकल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे या ७६ जागांपैकी ३६ विदर्भातील कापूस पट्ट्यातील आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणाऱ्या या ७६ जागा राज्यातील पुढील सरकार स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये असलेला भाजप १४८ जागा लढवत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ८० उमेदवार उभे केले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ५२ उमेदवार उभे केले आहेत. भाजपने सर्वाधिक ४७ उमेदवार विदर्भात, त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात ३२, उत्तर महाराष्ट्रात १७, मराठवाड्यात १९ आणि कोकण, ठाणे आणि मुंबईमध्ये ३३ उमेदवार उभे केले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०२ जागा लढवत आहे. तर शिवसेनाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९६ आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी ८७ जागा लढणार  आहे. उर्वरित जागा छोट्या मित्रपक्षांना गेल्या आहेत. अशातच भाजपा विरुद्ध ठाकरे गट अशी लढत ३० जागांवर होणार आहे. तर भाजपा विरुद्ध शरद पवार गट अशी लढत ३९ जागांवर होणार आहे. शिरपूर, डहाणू आणि पनवेल या तीन मतदारसंघात भाजप अनुक्रमे सीपीआय, सीपीआय(एम) आणि पीडब्ल्यूपीआय विरुद्ध लढणार आहे.

मात्र सर्वात मोठी लढत काँग्रेस आणि भाजपच्या ७६ जागांवर होणार आहे. ३६ जागा असलेल्या विदर्भाचा कापूस पट्ट्यातील उमेदवार कसे मतदान करतील, यावर काँग्रेस आणि भाजपचे भवितव्य अवलंबून राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील ३६ जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजही या भागांमध्ये निवडणूक लढवणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे सहाव्यांदा नागपूर दक्षिण पश्चिममधून काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्या विरोधात तर बावनकुळे काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्या विरोधात लढणार आहेत. नाना पटोळे यांची साकोलीत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्याशी लढत होणार आहे.

दुसरीकडे, काँग्रेस विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी मतदारसंघातून भाजपच्या कृष्णलाल सहारे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. चंद्रपूरमधून लोकसभेची जागा गमावल्यानंतर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आपली बल्लारपूरची जागा राखण्यासाठी काँग्रेसचे संतोष रावत यांच्याविरुद्ध लढणार आहेत.

अशातच प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते ही दोन महत्त्वाची पदे पटोले आणि वडेट्टीवार यांच्याकडे सोपवण्याच्या निर्णयावरून विदर्भ पुन्हा ताब्यात घेण्याचा काँग्रेसचा निर्धार दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान विदर्भात सर्वाधिक पसंती मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाने विदर्भातील १० पैकी पाच जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी १४ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ २८ जागांवरच विजय मिळवता आला.

कापूस पट्ट्यावर आपली पकड पुन्हा मिळवणे हे अवघड काम आहे हे भाजप नेतृत्वाला माहीत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप १२२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी विदर्भातून भाजपने ६२ पैकी ४४ जागा जिंकल्या. मात्र २०१९ मध्ये ही संख्या २९ जागांवर आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आक्रमकतेने जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मैदानात उतरल्याने भाजपला विश्वास आहे की ते विदर्भात अधिक मजबूत होतील. इतर मागासवर्गीय मतदारांना एकत्रित करण्यापासून ते दलितांना खूश करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांत, पक्षाने २८८ जागांवर विभागनिहाय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक टीम देखील तैनात केली आहे.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात ३१ जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत झाली होती. ज्यामध्ये काँग्रेसने आठ तर भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. विदर्भात लोकसभेची जादू पुन्हा निर्माण करण्यासाठी काँग्रेस आपल्या दलित, मुस्लिम आणि कुणबी व्होटबँकेवर लक्ष केंद्रित करत आहे. “बेरोजगारीमुळे केवळ विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. गंमत म्हणजे, सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी फारच थोडे केले आहे,” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस