शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 16:38 IST

जेव्हा ही योजना आणली तेव्हा काँग्रेस, शरद पवार-उबाठाची माणसे आमची खिल्ली उडवत होते, पण त्यांच्या नाकावर टिच्चून आम्ही महिलांच्या खात्यावर डिसेंबरपर्यंतचे पैसे टाकले असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

चांदवड - सरकार लोकांचे मत समजून घेणारे असते. कांद्यावरील निर्बंध दूर केले. आम्हाला ठेच लागली आहे. आम्ही यापुढे ताकही फुंकून पिणार आहे. जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत कांद्यावर अचानक निर्यात बंदी लागणार नाही असं ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. 

चांदवड येथील जाहीर सभेत फडणवीस म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापूस आणि सोयाबीनचा भाव पडला. ४ हजार कोटी आम्ही सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर दिले. ४०० खरेदी केंद्रे उघडली. आचारसंहितेपूर्वी आम्ही केंद्राला पत्र पाठवले होते. सगळ्या सोयाबीनची खरेदी राज्य सराकर हमीभावाने करेल. आम्ही भावांतर योजना आणली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी होईल त्यातील जे अंतर असेल त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही देऊ. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, सोयाबीनचा सरासरी दर ३८०० रुपये आहे. महाराष्ट्रात येऊन सांगतात ७ हजार रुपये भाव देऊ, लबाडाचं आवतन आहे. आम्ही जे बोलतो तेच करतो, ६ हजार रुपये सोयाबीनला भाव देणारच. १ रूपयांत पिकविमा दिला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना विजबिलाची माफी दिली. शेतकऱ्यांना शेतीपंपाचे शून्य वीजबिल पुढचे ५ वर्ष येईल. ३६५ दिवस दिवसा वीज द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून या देशातील पहिली शेती वीज वितरण कंपनी मी महाराष्ट्रात तयार केली. या कंपनी अंतर्गत १४ हजार मेगावॅट सौर प्रकल्पाला मान्यता दिली. पुढच्या काही महिन्यात ३६५ दिवस दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्याशिवाय पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, राहुल अहेर हॅट्रीक करून आले तर शेतकऱ्यांच्या ७/१२ वर कर्जाचा उतारा राहणार नाही. आम्ही कर्जमाफी करू. प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचं काम महायुती सरकारने केले. विकसित भारत करायचा असेल तर या देशाची ५० टक्के लोकसंख्या म्हणजे महिला सामाजिक, आर्थिक प्रगतीचं केंद्र होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. लखपती दीदी केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढे आली. व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला १ लाखाहून अधिक कमाई करतात त्या लखपती दीदी आहेत. २०२८ पर्यंत राज्यात ५० लाख महिला लखपती दीदी करायच्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली, त्यातून १५०० रुपये महिलांच्या खात्यावर देतोय. जेव्हा ही योजना आणली तेव्हा काँग्रेस, शरद पवार-उबाठाची माणसे आमची खिल्ली उडवत होते, पण त्यांच्या नाकावर टिच्चून आम्ही महिलांच्या खात्यावर डिसेंबरपर्यंतचे पैसे टाकले. सावत्र भाऊ राज्यात फिरतायेत. तुम्हाला मिळालेली योजना पाहावली नाही म्हणून महाविकास आघाडी कोर्टात गेले. या योजना पैशाचा चुराडा आहे असं कोर्टात म्हटलं पण कोर्टाने त्यांना फटकारलं. लाडकी बहीण योजना सुरूच राहील. आता पुन्हा सरकार आल्यावर २१०० रुपये महिलांना देणार आहोत असं आश्वासन फडणवीसांनी सभेत दिले.

दरम्यान,  मी २०१९ ला आलो होतो, तुम्हाला शब्द दिला होता. दुर्दैवाने माझ्याशी बेईमानी झाली, माझे सरकार आलं नाही. मग जेव्हा आले तेव्हा विस्तार करण्यासाठी जागाच नव्हती. आम्ही काही पदे रिक्त ठेवली. आज तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, तुम्ही राहुल आहेर यांच्या रुपाने मला आमदार द्या, पहिल्याच विस्तारात कॅबिनेट मंत्री इथं पाठवतो, माझी एक अट आहे. २० हजाराच्या आत लीड असेल राज्यमंत्री, जर २० हजाराच्या वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्री...मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो असं सांगत फडणवीसांनी राहुल आहेर यांना निवडून देण्याचं आवाहन जनतेला केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandvad-acचांदवडnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाFarmerशेतकरी