शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 16:38 IST

जेव्हा ही योजना आणली तेव्हा काँग्रेस, शरद पवार-उबाठाची माणसे आमची खिल्ली उडवत होते, पण त्यांच्या नाकावर टिच्चून आम्ही महिलांच्या खात्यावर डिसेंबरपर्यंतचे पैसे टाकले असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

चांदवड - सरकार लोकांचे मत समजून घेणारे असते. कांद्यावरील निर्बंध दूर केले. आम्हाला ठेच लागली आहे. आम्ही यापुढे ताकही फुंकून पिणार आहे. जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत कांद्यावर अचानक निर्यात बंदी लागणार नाही असं ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. 

चांदवड येथील जाहीर सभेत फडणवीस म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापूस आणि सोयाबीनचा भाव पडला. ४ हजार कोटी आम्ही सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर दिले. ४०० खरेदी केंद्रे उघडली. आचारसंहितेपूर्वी आम्ही केंद्राला पत्र पाठवले होते. सगळ्या सोयाबीनची खरेदी राज्य सराकर हमीभावाने करेल. आम्ही भावांतर योजना आणली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी होईल त्यातील जे अंतर असेल त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही देऊ. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, सोयाबीनचा सरासरी दर ३८०० रुपये आहे. महाराष्ट्रात येऊन सांगतात ७ हजार रुपये भाव देऊ, लबाडाचं आवतन आहे. आम्ही जे बोलतो तेच करतो, ६ हजार रुपये सोयाबीनला भाव देणारच. १ रूपयांत पिकविमा दिला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना विजबिलाची माफी दिली. शेतकऱ्यांना शेतीपंपाचे शून्य वीजबिल पुढचे ५ वर्ष येईल. ३६५ दिवस दिवसा वीज द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून या देशातील पहिली शेती वीज वितरण कंपनी मी महाराष्ट्रात तयार केली. या कंपनी अंतर्गत १४ हजार मेगावॅट सौर प्रकल्पाला मान्यता दिली. पुढच्या काही महिन्यात ३६५ दिवस दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्याशिवाय पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, राहुल अहेर हॅट्रीक करून आले तर शेतकऱ्यांच्या ७/१२ वर कर्जाचा उतारा राहणार नाही. आम्ही कर्जमाफी करू. प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचं काम महायुती सरकारने केले. विकसित भारत करायचा असेल तर या देशाची ५० टक्के लोकसंख्या म्हणजे महिला सामाजिक, आर्थिक प्रगतीचं केंद्र होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. लखपती दीदी केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढे आली. व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला १ लाखाहून अधिक कमाई करतात त्या लखपती दीदी आहेत. २०२८ पर्यंत राज्यात ५० लाख महिला लखपती दीदी करायच्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली, त्यातून १५०० रुपये महिलांच्या खात्यावर देतोय. जेव्हा ही योजना आणली तेव्हा काँग्रेस, शरद पवार-उबाठाची माणसे आमची खिल्ली उडवत होते, पण त्यांच्या नाकावर टिच्चून आम्ही महिलांच्या खात्यावर डिसेंबरपर्यंतचे पैसे टाकले. सावत्र भाऊ राज्यात फिरतायेत. तुम्हाला मिळालेली योजना पाहावली नाही म्हणून महाविकास आघाडी कोर्टात गेले. या योजना पैशाचा चुराडा आहे असं कोर्टात म्हटलं पण कोर्टाने त्यांना फटकारलं. लाडकी बहीण योजना सुरूच राहील. आता पुन्हा सरकार आल्यावर २१०० रुपये महिलांना देणार आहोत असं आश्वासन फडणवीसांनी सभेत दिले.

दरम्यान,  मी २०१९ ला आलो होतो, तुम्हाला शब्द दिला होता. दुर्दैवाने माझ्याशी बेईमानी झाली, माझे सरकार आलं नाही. मग जेव्हा आले तेव्हा विस्तार करण्यासाठी जागाच नव्हती. आम्ही काही पदे रिक्त ठेवली. आज तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, तुम्ही राहुल आहेर यांच्या रुपाने मला आमदार द्या, पहिल्याच विस्तारात कॅबिनेट मंत्री इथं पाठवतो, माझी एक अट आहे. २० हजाराच्या आत लीड असेल राज्यमंत्री, जर २० हजाराच्या वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्री...मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो असं सांगत फडणवीसांनी राहुल आहेर यांना निवडून देण्याचं आवाहन जनतेला केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandvad-acचांदवडnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाFarmerशेतकरी