शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 16:38 IST

जेव्हा ही योजना आणली तेव्हा काँग्रेस, शरद पवार-उबाठाची माणसे आमची खिल्ली उडवत होते, पण त्यांच्या नाकावर टिच्चून आम्ही महिलांच्या खात्यावर डिसेंबरपर्यंतचे पैसे टाकले असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

चांदवड - सरकार लोकांचे मत समजून घेणारे असते. कांद्यावरील निर्बंध दूर केले. आम्हाला ठेच लागली आहे. आम्ही यापुढे ताकही फुंकून पिणार आहे. जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत कांद्यावर अचानक निर्यात बंदी लागणार नाही असं ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. 

चांदवड येथील जाहीर सभेत फडणवीस म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापूस आणि सोयाबीनचा भाव पडला. ४ हजार कोटी आम्ही सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर दिले. ४०० खरेदी केंद्रे उघडली. आचारसंहितेपूर्वी आम्ही केंद्राला पत्र पाठवले होते. सगळ्या सोयाबीनची खरेदी राज्य सराकर हमीभावाने करेल. आम्ही भावांतर योजना आणली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी होईल त्यातील जे अंतर असेल त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही देऊ. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, सोयाबीनचा सरासरी दर ३८०० रुपये आहे. महाराष्ट्रात येऊन सांगतात ७ हजार रुपये भाव देऊ, लबाडाचं आवतन आहे. आम्ही जे बोलतो तेच करतो, ६ हजार रुपये सोयाबीनला भाव देणारच. १ रूपयांत पिकविमा दिला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना विजबिलाची माफी दिली. शेतकऱ्यांना शेतीपंपाचे शून्य वीजबिल पुढचे ५ वर्ष येईल. ३६५ दिवस दिवसा वीज द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून या देशातील पहिली शेती वीज वितरण कंपनी मी महाराष्ट्रात तयार केली. या कंपनी अंतर्गत १४ हजार मेगावॅट सौर प्रकल्पाला मान्यता दिली. पुढच्या काही महिन्यात ३६५ दिवस दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्याशिवाय पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, राहुल अहेर हॅट्रीक करून आले तर शेतकऱ्यांच्या ७/१२ वर कर्जाचा उतारा राहणार नाही. आम्ही कर्जमाफी करू. प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचं काम महायुती सरकारने केले. विकसित भारत करायचा असेल तर या देशाची ५० टक्के लोकसंख्या म्हणजे महिला सामाजिक, आर्थिक प्रगतीचं केंद्र होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. लखपती दीदी केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढे आली. व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला १ लाखाहून अधिक कमाई करतात त्या लखपती दीदी आहेत. २०२८ पर्यंत राज्यात ५० लाख महिला लखपती दीदी करायच्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली, त्यातून १५०० रुपये महिलांच्या खात्यावर देतोय. जेव्हा ही योजना आणली तेव्हा काँग्रेस, शरद पवार-उबाठाची माणसे आमची खिल्ली उडवत होते, पण त्यांच्या नाकावर टिच्चून आम्ही महिलांच्या खात्यावर डिसेंबरपर्यंतचे पैसे टाकले. सावत्र भाऊ राज्यात फिरतायेत. तुम्हाला मिळालेली योजना पाहावली नाही म्हणून महाविकास आघाडी कोर्टात गेले. या योजना पैशाचा चुराडा आहे असं कोर्टात म्हटलं पण कोर्टाने त्यांना फटकारलं. लाडकी बहीण योजना सुरूच राहील. आता पुन्हा सरकार आल्यावर २१०० रुपये महिलांना देणार आहोत असं आश्वासन फडणवीसांनी सभेत दिले.

दरम्यान,  मी २०१९ ला आलो होतो, तुम्हाला शब्द दिला होता. दुर्दैवाने माझ्याशी बेईमानी झाली, माझे सरकार आलं नाही. मग जेव्हा आले तेव्हा विस्तार करण्यासाठी जागाच नव्हती. आम्ही काही पदे रिक्त ठेवली. आज तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, तुम्ही राहुल आहेर यांच्या रुपाने मला आमदार द्या, पहिल्याच विस्तारात कॅबिनेट मंत्री इथं पाठवतो, माझी एक अट आहे. २० हजाराच्या आत लीड असेल राज्यमंत्री, जर २० हजाराच्या वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्री...मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो असं सांगत फडणवीसांनी राहुल आहेर यांना निवडून देण्याचं आवाहन जनतेला केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandvad-acचांदवडnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाFarmerशेतकरी