शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 12:30 IST

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत  यांच्यात खडाजंगी झाल्याचं बातम्या काल आल्या होत्या. मात्र आज नाना पटोले यांनी आपल्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही वाद झाला नसल्याचे सांगत, सगळ्या चर्चेचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख अगदी जवळ आली तरी राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यामधील जागावाटप पूर्ण झालेलं नाही. त्यात महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गट हे आमने सामने आलेले दिसत आहेत. तसेज जागावाटपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत  यांच्यात खडाजंगी झाल्याचं बातम्या काल आल्या होत्या. मात्र आज नाना पटोले यांनी आपल्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही वाद झाला नसल्याचे सांगत, सगळ्या चर्चेचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आहे. मात्र काँग्रेस हा महाराष्ट्रातील मूळ पक्ष असून, महाविकास आघाडीमध्ये जागावाटप हे मेरिटच्या आधारावर झालं पाहिजे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. 

संजय राऊतांसोबत झालेल्या वादाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, काल चाललेल्या बातम्यांबाबत आमचे मित्र संजय राऊत यांनी सकाळी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण असं काहीच बोललो नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र काल दिवसभर वृत्तवाहिन्यांवर यासंदर्भातील बातम्या सुरू होत्या. मी सुद्धा संजय राऊत नेमकं काय बोलले, असं विचारलं असता प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मला काही दाखवू शकली नाहीत. खरंतर हजारो मतदारांची मतदारयादीमधून नावं कमी करण्यात येत असल्याची बातमी चालवायला हवी होती, ती बातमी महत्त्वाची होती, मात्र तसं झालं नाही.  लोकशाही वाचवणं ही चौथ्या स्तंभाचीही जबाबदारी आहे. महायुतीमध्येही मारामाऱ्या सुरू आहेत, चंद्रपूरमध्ये मारामाऱ्या झाल्या, संघाचं शिस्तबद्ध असलेल्या नागपूरमध्ये मारामाऱ्या झाल्या. त्या बातम्याही महत्त्वाच्या आहेत, असे नाना पटोले यांनी सुनावले.  

संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सिस्टिमबाबत विधान केलं होतं. मी त्यांना आमची सिस्टिम समजावून सांगितली. आमच्या पक्षाचे हायकमांड असतात. हायकमांडला सगळी माहिती द्यावी लागते. शेवटी हायकमांड निर्णय घेतात. संजय राऊत आणि आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे. तुम्हीच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात, असे नाना पटोले प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हणाले.

ज्या जागा मेरिटच्या असतील, त्या त्या पक्षांनी घ्याव्यात, हे आम्ही आधीच स्पष्ट केलेलं आहे. त्या पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्रद्रोही भाजपा सरकार बसलेलं आहे. महाराष्ट्राला वाचवण हा आमचा धर्म आहे, हे आम्ही अनेकदा सांगितलं आहे. मात्र मेरिटच्या आधारावरच जागावाटप व्हावं, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस