शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 11:45 IST

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार? याबाबत सूचक विधान केलं आहे.  

मागच्या काही दिवसांपासून जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला १०५, ठाकरे गटाला ९५ आणि शरद पवार गटाला ८५ जागा सुटल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. मात्र महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार, सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण बनणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार? याबाबत सूचक विधान केलं आहे.  महाविकास आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याचं नाव मी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता जाहीर करेन, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असावा, यावरून मविआमधील घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद दिसत आहेत. एकीकडे ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंचं नाव समोर केलं जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील, तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव पुढे केलं जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकार आल्यास त्याचं नेतृत्व कोण करणार, याबाबत  सूचक विधान करताना संजय राऊत म्हणाले की, आज संध्याकाळी उमेदवारी याद्या जाहीर होऊद्यात. त्यानंतर निवडणुका होतील. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागतील. २३ तारखेला निकाल लागायला सुरुवात होईल, तेव्हा बरोब्बर साडे दहा वाजता मी तुम्हाला महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार हे मी तुम्हाला सांगेन.

यावेळी महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या चर्चेची झालेली प्रगती आणि त्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागा याबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीला जागावाटपावर शेवटचा हात फिरवण्यासाठी आता बैठकीची गरज आहे, असं मला वाटत नाही. शिवसेना ही या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल. तसेच शिवसेनेने सेंच्युरी मारावी, अशी लोकांची अपेक्षा आहे. फक्त जागावाटपात नाही, तर विजयामध्येही शिवसेनेने सेंच्युरी मारावी, असं लोकांना वाटतं. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे. मराठी माणसाचा पक्ष आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. त्यामुळे शिवसेनेने सेंच्युरी मारावी, अशी ११ कोटी जनतेची अपेक्षा आहे, असेही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीChief Ministerमुख्यमंत्री