शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 10:45 IST

एकीकडे मुस्लीम समाजाकडून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे महायुतीच्या प्रचारासाठी हिंदू विचारधारी संघटना एकवटल्या आहेत. 

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यात मतदारांना आकर्षिक करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. एका विशिष्ट समाजाच्या मतदानासाठी फतवा काढला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे तर दुसरीकडे घरोघरी पोहचून प्रचार केला जातोय. मतांचे धुव्रीकरण करण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. मुस्लिम संघटना आणि मौलवींकडून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यावर व्होट जिहादचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. त्यानंतर आता हिंदू मतांना एकजूट करण्यासाठी संघ परिवारही मैदानात उतरला आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीपासून संघ परिवाराकडून महाराष्ट्रातील सलग्न संघटना आणि प्रचारकांच्या छोट्या छोट्या बैठका सातत्याने घेतल्या जात आहेत. आता या बैठकांना आणखी वेग आला आहे. घरोघरी जात हिंदू मतदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात आरएसएसनं सजग रहो हे अभियान सुरू केले आहे. त्यात संघाचे ३३ प्रचारक आणि संघ विचारसरणीच्या जवळपास १०० संघटनांना ग्राऊंडवर उतरल्या आहेत. 'सजग रहो' मोहिमेत सहभागी झालेल्या संस्थांचे नेतृत्व चाणक्य प्रतिष्ठान, मातंग साहित्य परिषद, रणरागिणी आणि सेवाभावी संस्था करत आहेत. या सर्व संघटना महाराष्ट्रातील चार प्रादेशिक विभागात (कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ) सक्रिय आहेत. 

महाराष्ट्रात मराठी मुस्लिम सेवा संघाच्या नेतृत्वाखाली १८० हून अधिक स्वयंसेवी संस्था मुस्लीम मतदारांना एकत्र करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असल्याची माहिती RSS ला मिळाली आहे. या संस्था मुस्लीम मतदारांची नावे यादीत टाकण्यापासून मतदानापर्यंत सर्व काम करणार आहेत. या संघटनांच्या सक्रियतेमुळे २०२४ मध्ये मुस्लिम मतदारांची मतदानाची टक्केवारी १५% वाढली आहे. त्यामुळे आधीच कार्यरत असलेल्या संघाने आपली ताकद दुप्पट करून हिंदू मतदारांना एकत्र करण्यासाठी अहोरात्र काम सुरू केले आहे. यातच भाजपाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या वक्तव्यातून हिंदू समाजाला इशारा देऊन मतांचे ध्रुवीकरण सुरू केले आहे. आरएसएसची 'सजग रहो' ही मोहीम त्याचाच एक भाग आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींचा ' एक है तो सेफ है' आणि योगींच्या 'एक है तो नेक है' या घोषणा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, बांगलादेशी घुसखोरी आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रभावाबाबतही ‘सजग रहो’ मोहिमेद्वारे लोकांना सावध केले जात आहे. याशिवाय, विहिंप आणि बजरंग दल या आरएसएसच्या सहकारी संघटना महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. जातिभेदापासून दूर राहून हिंदू म्हणून मतदानात सहभागी होण्याचे आवाहनही ते करत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संघ आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये परस्पर समन्वय ठेऊन समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आरएसएस आणि त्याच्या विविध घटकांनी आतापर्यंत अनेक बैठका घेतल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीHinduहिंदूMuslimमुस्लीम