शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 14:00 IST

माझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे, आम्ही विचारसरणी सोडून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रश्न नाही, जे वादाचे विषय असतील त्याला आमचा पाठिंबा नाही असं मलिकांनी सांगितले.

मुंबई - बटेंगे तो कटेंगे हे कुठेतरी धार्मिक भावनेशी खेळण्याचं काम आहे. यामुळे मत मिळत नाही हे लोकांना कळलं पाहिजे. याच प्रकारच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसला आहे. भाजपाला याचा फायदा महाराष्ट्रात होणार नाही. अशाप्रकारे विधाने करून कुठल्याही निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही त्याला स्वीकारणार नाही अशी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांनी घेतली आहे. 

नवाब मलिकांनी सांगितले की,  कुठल्याही भावनेशी खेळण्यासाठी शा‍ब्दिक खेळ केले जातात. या देशात जे मुलभूत अधिकार आहेत ते कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे. प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यावर कुणी बंदी घालू शकत नाही. बरेच लोक वेगवेगळे धर्मांतर केले जाते. कुठल्याही नागरिकाला ज्या धर्मात जायचं आहे तो जाऊ शकतो कुणी थांबवू शकत नाही. राजकीय फायद्यासाठी हे विषय घेतले जातात असं सांगत नवाब मलिकांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या घोषणांवर प्रहार केला आहे.

तसेच माझा विरोध भाजपा करते हे उघड सत्य आहे. लोकांना ते दिसते. माझ्याविरोधात महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे सत्य आहे. आमची विचारसरणी सोडून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रश्न नाही. जो काही वादविवादाचे विषय असतील त्याला आमचा पाठिंबा नाही.जे माझ्याकडे बोट दाखवतायेत कालपर्यंत ते सगळे भाजपासोबत होते. काँग्रेसचे नेते भाजपात गेले ते पुन्हा इथे आले आहेत. शरद पवार भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले, १० वर्ष पुलोदचा फॉर्म्युला महाराष्ट्रात चाललाय. मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते. ममता बॅनर्जी भाजपासोबत होत्या. फारूख अब्दुला, मुफ्ती सईद हे जनता दलाचे सरकार असताना पाठिंबा देत होते. राजकीय परिस्थितीनुसार प्रत्येकाने भूमिकेत तडजोड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काही तडजोड करून राजकारण करत असेल तर आता जे बोट दाखवतायेत त्यांनी मागील इतिहास पाहिला पाहिजे असं सांगत नवाब मलिकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे.

दरम्यान, ज्यांना माझ्यापासून राजकीय धोका असेल ते लोक माझा जामीन रद्द व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. आम्ही आमची बाजू कोर्टात मांडू. राजकीय पार्श्वभूमी असल्याने ज्यारितीने मी माझे विचार मांडतोय. ताकदीने दोन्ही ठिकाणी निवडणूक लढतोय त्याचे नुकसान कोणाला होत असेल तर ते अशाप्रकारे प्रयत्न करत आहेत. कोर्टाच्या आदेशाने मी गप्प होतो. माध्यमांशी संवाद साधला नाही. परंतु आता मला कोर्टाने परवानगी दिली आहे. मी माध्यमांशी बोलतोय. राजकीय माणूस देशात, राज्यात चांगले वाईट घडत असेल तर मी बोलणार. माझ्यामुळे कुणी अडचणीत येत असेल तर माझा जामीन रद्द होण्यासाठी ते काम करतील असा आरोपही नवाब मलिकांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mankhurd-shivaji-nagar-acमानखुर्द शिवाजी नगरmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकnawab malikनवाब मलिकAjit Pawarअजित पवारBJPभाजपाSharad Pawarशरद पवार