शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 14:00 IST

माझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे, आम्ही विचारसरणी सोडून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रश्न नाही, जे वादाचे विषय असतील त्याला आमचा पाठिंबा नाही असं मलिकांनी सांगितले.

मुंबई - बटेंगे तो कटेंगे हे कुठेतरी धार्मिक भावनेशी खेळण्याचं काम आहे. यामुळे मत मिळत नाही हे लोकांना कळलं पाहिजे. याच प्रकारच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसला आहे. भाजपाला याचा फायदा महाराष्ट्रात होणार नाही. अशाप्रकारे विधाने करून कुठल्याही निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही त्याला स्वीकारणार नाही अशी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांनी घेतली आहे. 

नवाब मलिकांनी सांगितले की,  कुठल्याही भावनेशी खेळण्यासाठी शा‍ब्दिक खेळ केले जातात. या देशात जे मुलभूत अधिकार आहेत ते कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे. प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यावर कुणी बंदी घालू शकत नाही. बरेच लोक वेगवेगळे धर्मांतर केले जाते. कुठल्याही नागरिकाला ज्या धर्मात जायचं आहे तो जाऊ शकतो कुणी थांबवू शकत नाही. राजकीय फायद्यासाठी हे विषय घेतले जातात असं सांगत नवाब मलिकांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या घोषणांवर प्रहार केला आहे.

तसेच माझा विरोध भाजपा करते हे उघड सत्य आहे. लोकांना ते दिसते. माझ्याविरोधात महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे सत्य आहे. आमची विचारसरणी सोडून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रश्न नाही. जो काही वादविवादाचे विषय असतील त्याला आमचा पाठिंबा नाही.जे माझ्याकडे बोट दाखवतायेत कालपर्यंत ते सगळे भाजपासोबत होते. काँग्रेसचे नेते भाजपात गेले ते पुन्हा इथे आले आहेत. शरद पवार भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले, १० वर्ष पुलोदचा फॉर्म्युला महाराष्ट्रात चाललाय. मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते. ममता बॅनर्जी भाजपासोबत होत्या. फारूख अब्दुला, मुफ्ती सईद हे जनता दलाचे सरकार असताना पाठिंबा देत होते. राजकीय परिस्थितीनुसार प्रत्येकाने भूमिकेत तडजोड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काही तडजोड करून राजकारण करत असेल तर आता जे बोट दाखवतायेत त्यांनी मागील इतिहास पाहिला पाहिजे असं सांगत नवाब मलिकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे.

दरम्यान, ज्यांना माझ्यापासून राजकीय धोका असेल ते लोक माझा जामीन रद्द व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. आम्ही आमची बाजू कोर्टात मांडू. राजकीय पार्श्वभूमी असल्याने ज्यारितीने मी माझे विचार मांडतोय. ताकदीने दोन्ही ठिकाणी निवडणूक लढतोय त्याचे नुकसान कोणाला होत असेल तर ते अशाप्रकारे प्रयत्न करत आहेत. कोर्टाच्या आदेशाने मी गप्प होतो. माध्यमांशी संवाद साधला नाही. परंतु आता मला कोर्टाने परवानगी दिली आहे. मी माध्यमांशी बोलतोय. राजकीय माणूस देशात, राज्यात चांगले वाईट घडत असेल तर मी बोलणार. माझ्यामुळे कुणी अडचणीत येत असेल तर माझा जामीन रद्द होण्यासाठी ते काम करतील असा आरोपही नवाब मलिकांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mankhurd-shivaji-nagar-acमानखुर्द शिवाजी नगरmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकnawab malikनवाब मलिकAjit Pawarअजित पवारBJPभाजपाSharad Pawarशरद पवार