शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 07:23 IST

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीने अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासात खोडा घालण्याचेच काम केले, ते सरकार म्हणजे विकासाचे मारेकरी होते, त्यांना पुन्हा सत्तेची संधी देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे झालेल्या जाहीर सभेत केले.

कोल्हापूर -  महाविकास आघाडीने अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासात खोडा घालण्याचेच काम केले, ते सरकार म्हणजे विकासाचे मारेकरी होते, त्यांना पुन्हा सत्तेची संधी देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे झालेल्या जाहीर सभेत केले. मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या राज्यातील प्रचाराचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, रिपब्लिकन नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

धनुष्यबाण हाच आमचा प्राण आहे, तो वाचवण्यासाठीच ५० आमदारांनी सत्ता सोडली. तसे आम्ही केले नसते तर बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसला विकली असती असा टोला शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना हाणला. ते म्हणाले, तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला तो खरा महाराष्ट्रद्रोह आहे. महाराष्ट्र आजही गुंतवणुकीत आणि उद्योगातही एक नंबरलाच आहे. तुम्ही काँग्रेससोबत जाऊन मविआचे सरकार स्थापन केले. त्या अडीच वर्षांत काय केले याचा हिशेब द्या.

घोषणांचा पाऊस 'यह तो ट्रेलर है...असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सरकार आल्यास काय करणार त्या घोषणांचा पाऊसच पाडला. प्रमुख दहा घोषणा त्यांनी जाहीर केल्या. आमचं ठरलंय अशी घोषणा कोल्हापुरात गाजली होती. परंतु कोल्हापुरात आता वारं फिरलंय, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीत संविधान बदलणार असा खोटा प्रचार केल्याने वेगळा निकाल लागला. परंतू यावेळेला या प्रचाराला जनता भूलणार नाही. कारण 'जबतक सुरज-चाँद रहेगा बाबासाहब तेरा संविधान रहेगा' अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले असा कांगावा मविआचे नेते करत आहेत. तुम्ही महाराष्ट्रात राहून गुजरातचे प्रमोशन करता हा महाराष्ट्र द्रोह नाही काय? महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केले. पायाभुत सुविधांचे जाळे निर्माण केले. महामंडळांची स्थापना करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विविध योजना राबवून सर्वसामान्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आम्ही पक्ष चोरले असा आरोप करून विरोधक जनतेच्या मनांत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थारा देवू नका.- अजित पवार, उपमुख्यमंत्री 

महायुतीने जाहीर केली दहा वचने ■ लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला १,५०० वरून २,१०० रुपये देणार तसेच महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करणार.■ शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२,००० वरून १५,००० रु, देण्याचे तसेच एमएसपीवर २० टक्के अनुदान देणार.■ प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देणार.■ वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला १,५०० वरून २,१०० रुपये देणार.■ जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार.■ २५ लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना रुपये १०,००० विद्यावेतन देणार.■ ४५,००० गावांत पांदण रस्ते बांधणार.■ अंगणवाडी आणि आशासेविकांना महिन्याला १५,००० रुपये वेतन आणि संरक्षण देणार.■ वीजबिलात ३० टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार.■ सरकार स्थापनेनंतर 'व्हिजन महाराष्ट्र २०२९ 'आराखडा १०० दिवसांच्या आत जाहीर करणार.  महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले असा कांगावा मविआचे नेते करत आहेत. तुम्ही महाराष्ट्रात राहून गुजरातचे प्रमोशन करता हा महाराष्ट्र द्रोह नाही काय? महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केले. पायाभुत सुविधांचे जाळे निर्माण केले. महामंडळांची स्थापना करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विविध योजना राबवून सर्वसामान्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीआम्ही पक्ष चोरले असा आरोप करून विरोधक जनतेच्या मनांत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थारा देवू नका. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुतीkolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार