शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 19:17 IST

बारामती विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जयंत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

Baramati Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर बारामती विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. बारामती मतदारसंघात यंदा राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत होणार आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळणार आहे. युगेंद्र पवार यांच्या विजयासाठी शरद पवार यांनी स्वत: ताकद लावल्याने बारामतीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. बारामतीकर आपल्या बाजूने निकाल देतील अशी खात्री अजित पवारांना आहे. तर दुसरीकडे आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बारामतीच्या निकालाबाबत मोठं विधान केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला होता. खुद्द अजित पवार यांच्या विधानसभा मतदारसंघातच सुनेत्रा पवार लोकसभेला पिछाडीवर राहिल्या होत्या. त्यामुळे यावेळी बारामतीची निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच अजित पवारांसमोर युगेंद्र पवार यांचे तगडे आव्हान असणार आहे. १९९१ पासून एकतर्फी अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातील मतदार यावेळी काय निकाल देणार याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी बारामतीच्या निकालाबाबत तसेच युगेंद्र पवारांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

"बारामतीमध्ये युगेंद्र पवार निवडून येण्याची शक्यता ५० टक्क्यांच्या वर आहे. सुप्रिया सुळेंच्या वेळी आम्ही चाचपणी करत होतो तेव्हा सगळ्यात कमी लीड बारामती मतदारसंघात मिळेल असं वाटत होतं. आमच्या वेगवेगळ्या सर्वेक्षणातही असं दिसत होतं की बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना सर्वात कमी लीड मिळेल. मत मोजल्यानंतर लक्षात आलं की सर्वात जास्त लीड बारामतीमध्ये मिळाला. त्यामुळे बारामतीमधील लोक मनातील गोष्टी समोर सांगत नाहीत. त्याच्या मनात जे आहे ते मतपेटीत जाऊन टाकतात. हा फार मोठा अनुभव लोकसभा निवडणुकीतून आलेला आहे. त्यामुळे लोकांना बारामतीमध्ये मोकळेपणा बोलता येत नाहीये असं दिसत आहे. पण लोकसभेच्या निकालानंतर अधिक प्रतिसाद मिळायला लागला आहे. युगेंद्र पवार जिथे जात आहेत तिथे त्यांचे स्वागतही व्यवस्थित होत आहे. त्यामुळे लोकांना हे हवं असेल कदाचित. पण लोक हे उघडपणे बोलत नाहीत. त्यामुळे बारामतीमध्ये निर्णय कसा लागेल हे सांगणे मुश्किल आहे. पण युगेंद्र पवारांना लोकांची साथ जास्त आहे असं दिसतं," असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

यावेळी जयंत पाटील यांना ८७ पैकी शरद पवार गटाच्या किती जागा येतील असा सवाल विचारण्यात आला होता. "लोकसभा निवडणुकीत १० जागांवर उमेदवार दिले तेव्हा मला आधी वाटायचं की चार ते पाच येतील. मी गमतीने सांगायचे की सगळे होते तेव्हा चार होते आणि आता चाराचे पाच झाले तरी मी खूष आहे. महाराष्ट्रात फिरायला लागलो तेव्हा वाटायला लागलं सात येतील. पण आमचे आठ उमेदवार निवडून आले. तसं आता महाराष्ट्रात फिरून आल्यावर सांगता येईल की महाराष्ट्रात विधानसभेला आमचे किती उमेदवार निवडून येतील," असं जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024baramati-acबारामतीyugendra pawarयुगेंद्र पवारJayant Patilजयंत पाटील