शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
3
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
4
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
5
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
6
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
7
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
8
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
9
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
10
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
11
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
12
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
13
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
14
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
15
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
16
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
17
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
18
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
19
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 19:17 IST

बारामती विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जयंत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

Baramati Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर बारामती विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. बारामती मतदारसंघात यंदा राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत होणार आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळणार आहे. युगेंद्र पवार यांच्या विजयासाठी शरद पवार यांनी स्वत: ताकद लावल्याने बारामतीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. बारामतीकर आपल्या बाजूने निकाल देतील अशी खात्री अजित पवारांना आहे. तर दुसरीकडे आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बारामतीच्या निकालाबाबत मोठं विधान केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला होता. खुद्द अजित पवार यांच्या विधानसभा मतदारसंघातच सुनेत्रा पवार लोकसभेला पिछाडीवर राहिल्या होत्या. त्यामुळे यावेळी बारामतीची निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच अजित पवारांसमोर युगेंद्र पवार यांचे तगडे आव्हान असणार आहे. १९९१ पासून एकतर्फी अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातील मतदार यावेळी काय निकाल देणार याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी बारामतीच्या निकालाबाबत तसेच युगेंद्र पवारांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

"बारामतीमध्ये युगेंद्र पवार निवडून येण्याची शक्यता ५० टक्क्यांच्या वर आहे. सुप्रिया सुळेंच्या वेळी आम्ही चाचपणी करत होतो तेव्हा सगळ्यात कमी लीड बारामती मतदारसंघात मिळेल असं वाटत होतं. आमच्या वेगवेगळ्या सर्वेक्षणातही असं दिसत होतं की बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना सर्वात कमी लीड मिळेल. मत मोजल्यानंतर लक्षात आलं की सर्वात जास्त लीड बारामतीमध्ये मिळाला. त्यामुळे बारामतीमधील लोक मनातील गोष्टी समोर सांगत नाहीत. त्याच्या मनात जे आहे ते मतपेटीत जाऊन टाकतात. हा फार मोठा अनुभव लोकसभा निवडणुकीतून आलेला आहे. त्यामुळे लोकांना बारामतीमध्ये मोकळेपणा बोलता येत नाहीये असं दिसत आहे. पण लोकसभेच्या निकालानंतर अधिक प्रतिसाद मिळायला लागला आहे. युगेंद्र पवार जिथे जात आहेत तिथे त्यांचे स्वागतही व्यवस्थित होत आहे. त्यामुळे लोकांना हे हवं असेल कदाचित. पण लोक हे उघडपणे बोलत नाहीत. त्यामुळे बारामतीमध्ये निर्णय कसा लागेल हे सांगणे मुश्किल आहे. पण युगेंद्र पवारांना लोकांची साथ जास्त आहे असं दिसतं," असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

यावेळी जयंत पाटील यांना ८७ पैकी शरद पवार गटाच्या किती जागा येतील असा सवाल विचारण्यात आला होता. "लोकसभा निवडणुकीत १० जागांवर उमेदवार दिले तेव्हा मला आधी वाटायचं की चार ते पाच येतील. मी गमतीने सांगायचे की सगळे होते तेव्हा चार होते आणि आता चाराचे पाच झाले तरी मी खूष आहे. महाराष्ट्रात फिरायला लागलो तेव्हा वाटायला लागलं सात येतील. पण आमचे आठ उमेदवार निवडून आले. तसं आता महाराष्ट्रात फिरून आल्यावर सांगता येईल की महाराष्ट्रात विधानसभेला आमचे किती उमेदवार निवडून येतील," असं जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024baramati-acबारामतीyugendra pawarयुगेंद्र पवारJayant Patilजयंत पाटील