शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 19:59 IST

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यात अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्याचं दिसून आले. 

मुंबई - सध्याच्या राजकारणात पक्षांतरं करणे हे काही नवीन राहिले नाही. आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात तर परवा तिसऱ्याच पक्षात असणारे अनेक नेते राजकारणात सापडतील. आयाराम-गयाराम ही संस्कृती राजकारणात ५० वर्षापूर्वीच आली होती. आयाराम गयाराम या म्हणीची सुरुवातच १९६९ मध्ये हरियाणात झाली. जिथे आयाराम नावाचे एक आमदार होते, त्यांनी एका दिवसात २ राजकीय पक्ष बदलले होते. तेव्हापासून आयाराम गयाराम असं राजकारणात बोलू लागले.

लोकमत दिवाळी अंक 'दीपोत्सव' यात राजकीय विश्लेषक योगेद्र यादव लिहितात की, हरयाणाचेच आणखी एक उदाहरण घ्यायचे तर १९८० मध्ये मुख्यमंत्री भजनलाल यांनी आपल्या सर्व आमदारांना घेऊन एका रात्रीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता आणि सरकार बदलले होते. तेव्हा आज दिसतात त्या घटना काही अपवाद नाहीत. देशभरात असे अनेक किस्से सांगता येतील. मुद्दा हाच की ज्या घटनांमुळे आपल्याला आज वाटते की राजकारणाने अत्यंत हीन पातळी गाठली आहे तशा घटना देशाच्या इतिहासात आजवर अनेकदा घडल्या आहेत, जुन्याच आहेत असं त्यांनी म्हटलं. 

२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरीच राजकीय उलथापालथ राजकारणात घडली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदावरून भाजपाशी काडीमोड घेत थेट विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यानंतर अडीच वर्षात ठाकरे सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ४० आमदारांनी भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात महायुतीचं सरकार आणलं. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर वर्षभरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली.

अजित पवार यांच्यासह दिग्गज राष्ट्रवादी नेत्यांनी ४० आमदारांसह वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षाचे २ गट तयार झाले. आजच्या घडीला राज्यात ६ प्रमुख पक्ष असून त्यात भाजपा-काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहेत तर शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे गटही रिंगणात आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश घेत आहेत. मात्र राजकारणातील ही आयाराम गयाराम राजकीय संस्कृती फार जुनी आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४