शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 19:59 IST

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यात अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्याचं दिसून आले. 

मुंबई - सध्याच्या राजकारणात पक्षांतरं करणे हे काही नवीन राहिले नाही. आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात तर परवा तिसऱ्याच पक्षात असणारे अनेक नेते राजकारणात सापडतील. आयाराम-गयाराम ही संस्कृती राजकारणात ५० वर्षापूर्वीच आली होती. आयाराम गयाराम या म्हणीची सुरुवातच १९६९ मध्ये हरियाणात झाली. जिथे आयाराम नावाचे एक आमदार होते, त्यांनी एका दिवसात २ राजकीय पक्ष बदलले होते. तेव्हापासून आयाराम गयाराम असं राजकारणात बोलू लागले.

लोकमत दिवाळी अंक 'दीपोत्सव' यात राजकीय विश्लेषक योगेद्र यादव लिहितात की, हरयाणाचेच आणखी एक उदाहरण घ्यायचे तर १९८० मध्ये मुख्यमंत्री भजनलाल यांनी आपल्या सर्व आमदारांना घेऊन एका रात्रीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता आणि सरकार बदलले होते. तेव्हा आज दिसतात त्या घटना काही अपवाद नाहीत. देशभरात असे अनेक किस्से सांगता येतील. मुद्दा हाच की ज्या घटनांमुळे आपल्याला आज वाटते की राजकारणाने अत्यंत हीन पातळी गाठली आहे तशा घटना देशाच्या इतिहासात आजवर अनेकदा घडल्या आहेत, जुन्याच आहेत असं त्यांनी म्हटलं. 

२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरीच राजकीय उलथापालथ राजकारणात घडली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदावरून भाजपाशी काडीमोड घेत थेट विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यानंतर अडीच वर्षात ठाकरे सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ४० आमदारांनी भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात महायुतीचं सरकार आणलं. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर वर्षभरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली.

अजित पवार यांच्यासह दिग्गज राष्ट्रवादी नेत्यांनी ४० आमदारांसह वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षाचे २ गट तयार झाले. आजच्या घडीला राज्यात ६ प्रमुख पक्ष असून त्यात भाजपा-काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहेत तर शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे गटही रिंगणात आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश घेत आहेत. मात्र राजकारणातील ही आयाराम गयाराम राजकीय संस्कृती फार जुनी आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४