शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 11:57 IST

अलीकडच्या काळात अजित पवार गटातील नेत्यांनी निकालानंतर काहीही घडू शकते अशी विधाने केल्यानं चर्चा झाली होती, त्यात नवाब मलिकांना भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचाराला हजेरी लावली त्यामुळे महायुतीत वितुष्ट आहे का असं चित्र समोर आले आहे. 

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत अजित पवारांचे सूर बदलले दिसून येत आहेत. मोदी-योगी निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. मात्र बारामतीत मला कुणाची सभा नको असं स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले आहे. त्याशिवाय योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही असं थेट उत्तर अजित पवारांनी दिले आहे. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बारामतीत मोदी सभा घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, बारामतीत मला कुणाची सभा नको. त्यापेक्षा इतर भागात जाऊन सभा घेणे आवश्यक आहे. तिथे वरिष्ठांच्या सभा घेतल्या जातील असं उत्तर त्यांनी दिले. त्याशिवाय महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे. तुम्ही इतर राज्यांची तुलना महाराष्ट्राशी करू नका. महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येतात, त्यांचा विचार करून बोलून जातात. परंतु महाराष्ट्रातील लोकांनी हे कदापि मान्य केले नाही हा आजवरचा महाराष्ट्रातील निवडणुकांचा इतिहास आहे असं भाष्य अजित पवारांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर केले.

नवाब मलिकांना भाजपाचा विरोध तरीही...

नवाब मलिकांना उमेदवारी देण्यावरून भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून मलिकांना अधिकृत उमेदवारी दिली. यावरूनही अजित पवारांनी मलिकांची पाठराखण केली आहे. नवाब मलिकांना आम्ही उमेदवारी दिली, घड्याळाचे चिन्ह दिले आहे. त्यांच्या प्रचाराला मी जाणारच..नवाब मलिकांवर आरोप झालेत, आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही त्यांना दोषी कसं ठरवता असा सवालही अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपा आणि शिंदेसेनेला विचारला आहे. 

निवडणुकीच्या निकालानंतर समीकरण बदलणार?

दरम्यान, निकालनंतर पुढचं काही सांगणे आता कठीण आहे. एका बाजूला आघाडी, दुसऱ्या बाजूला युती आहे. दोन्हीकडे ३-३ पक्ष आहेत. उद्या आघाडी सरकार येते की युती सरकार हे थोडावेळ बाजूला ठेवू, पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतील हे पाहावे लागेल. त्यानंतर त्याचे खरे गणित जुळवले जाईल. त्यात कदाचित निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलूही शकतात. निकालानंतर बहुमताचं गणित जुळत नसेल तर सरकार आणण्यासाठी गणित जुळवावे लागेलच. काही ना काही करावे लागेल. ६ पक्ष आहेत. केवळ २-३ पक्ष नाहीत. त्यामुळे ६ पक्षांचं गणित जुळवण्यासाठी भरपूर वाव आहे असं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी एका मुलाखतीत केले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाMahayutiमहायुतीnawab malikनवाब मलिक