शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 11:57 IST

अलीकडच्या काळात अजित पवार गटातील नेत्यांनी निकालानंतर काहीही घडू शकते अशी विधाने केल्यानं चर्चा झाली होती, त्यात नवाब मलिकांना भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचाराला हजेरी लावली त्यामुळे महायुतीत वितुष्ट आहे का असं चित्र समोर आले आहे. 

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत अजित पवारांचे सूर बदलले दिसून येत आहेत. मोदी-योगी निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. मात्र बारामतीत मला कुणाची सभा नको असं स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले आहे. त्याशिवाय योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही असं थेट उत्तर अजित पवारांनी दिले आहे. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बारामतीत मोदी सभा घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, बारामतीत मला कुणाची सभा नको. त्यापेक्षा इतर भागात जाऊन सभा घेणे आवश्यक आहे. तिथे वरिष्ठांच्या सभा घेतल्या जातील असं उत्तर त्यांनी दिले. त्याशिवाय महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे. तुम्ही इतर राज्यांची तुलना महाराष्ट्राशी करू नका. महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येतात, त्यांचा विचार करून बोलून जातात. परंतु महाराष्ट्रातील लोकांनी हे कदापि मान्य केले नाही हा आजवरचा महाराष्ट्रातील निवडणुकांचा इतिहास आहे असं भाष्य अजित पवारांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर केले.

नवाब मलिकांना भाजपाचा विरोध तरीही...

नवाब मलिकांना उमेदवारी देण्यावरून भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून मलिकांना अधिकृत उमेदवारी दिली. यावरूनही अजित पवारांनी मलिकांची पाठराखण केली आहे. नवाब मलिकांना आम्ही उमेदवारी दिली, घड्याळाचे चिन्ह दिले आहे. त्यांच्या प्रचाराला मी जाणारच..नवाब मलिकांवर आरोप झालेत, आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही त्यांना दोषी कसं ठरवता असा सवालही अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपा आणि शिंदेसेनेला विचारला आहे. 

निवडणुकीच्या निकालानंतर समीकरण बदलणार?

दरम्यान, निकालनंतर पुढचं काही सांगणे आता कठीण आहे. एका बाजूला आघाडी, दुसऱ्या बाजूला युती आहे. दोन्हीकडे ३-३ पक्ष आहेत. उद्या आघाडी सरकार येते की युती सरकार हे थोडावेळ बाजूला ठेवू, पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतील हे पाहावे लागेल. त्यानंतर त्याचे खरे गणित जुळवले जाईल. त्यात कदाचित निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलूही शकतात. निकालानंतर बहुमताचं गणित जुळत नसेल तर सरकार आणण्यासाठी गणित जुळवावे लागेलच. काही ना काही करावे लागेल. ६ पक्ष आहेत. केवळ २-३ पक्ष नाहीत. त्यामुळे ६ पक्षांचं गणित जुळवण्यासाठी भरपूर वाव आहे असं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी एका मुलाखतीत केले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाMahayutiमहायुतीnawab malikनवाब मलिक