शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 11:57 IST

अलीकडच्या काळात अजित पवार गटातील नेत्यांनी निकालानंतर काहीही घडू शकते अशी विधाने केल्यानं चर्चा झाली होती, त्यात नवाब मलिकांना भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचाराला हजेरी लावली त्यामुळे महायुतीत वितुष्ट आहे का असं चित्र समोर आले आहे. 

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत अजित पवारांचे सूर बदलले दिसून येत आहेत. मोदी-योगी निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. मात्र बारामतीत मला कुणाची सभा नको असं स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले आहे. त्याशिवाय योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही असं थेट उत्तर अजित पवारांनी दिले आहे. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बारामतीत मोदी सभा घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, बारामतीत मला कुणाची सभा नको. त्यापेक्षा इतर भागात जाऊन सभा घेणे आवश्यक आहे. तिथे वरिष्ठांच्या सभा घेतल्या जातील असं उत्तर त्यांनी दिले. त्याशिवाय महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे. तुम्ही इतर राज्यांची तुलना महाराष्ट्राशी करू नका. महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येतात, त्यांचा विचार करून बोलून जातात. परंतु महाराष्ट्रातील लोकांनी हे कदापि मान्य केले नाही हा आजवरचा महाराष्ट्रातील निवडणुकांचा इतिहास आहे असं भाष्य अजित पवारांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर केले.

नवाब मलिकांना भाजपाचा विरोध तरीही...

नवाब मलिकांना उमेदवारी देण्यावरून भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून मलिकांना अधिकृत उमेदवारी दिली. यावरूनही अजित पवारांनी मलिकांची पाठराखण केली आहे. नवाब मलिकांना आम्ही उमेदवारी दिली, घड्याळाचे चिन्ह दिले आहे. त्यांच्या प्रचाराला मी जाणारच..नवाब मलिकांवर आरोप झालेत, आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही त्यांना दोषी कसं ठरवता असा सवालही अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपा आणि शिंदेसेनेला विचारला आहे. 

निवडणुकीच्या निकालानंतर समीकरण बदलणार?

दरम्यान, निकालनंतर पुढचं काही सांगणे आता कठीण आहे. एका बाजूला आघाडी, दुसऱ्या बाजूला युती आहे. दोन्हीकडे ३-३ पक्ष आहेत. उद्या आघाडी सरकार येते की युती सरकार हे थोडावेळ बाजूला ठेवू, पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतील हे पाहावे लागेल. त्यानंतर त्याचे खरे गणित जुळवले जाईल. त्यात कदाचित निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलूही शकतात. निकालानंतर बहुमताचं गणित जुळत नसेल तर सरकार आणण्यासाठी गणित जुळवावे लागेलच. काही ना काही करावे लागेल. ६ पक्ष आहेत. केवळ २-३ पक्ष नाहीत. त्यामुळे ६ पक्षांचं गणित जुळवण्यासाठी भरपूर वाव आहे असं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी एका मुलाखतीत केले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाMahayutiमहायुतीnawab malikनवाब मलिक