शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 19:49 IST

मनसेसोबत चर्चा, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कुणासोबत काम करणे सोपे यासारख्या अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी 'लोकमत'च्या मुलाखतीत भाष्य केले आहे.

मुंबई - राजकारणात 'जर-तर'ला काही अर्थ नसतो. शिवसेना १४७, भाजपा १२७ आणि  मित्रपक्ष १८ हा आमचा प्रस्ताव जर २०१४ साली उद्धव ठाकरेंनी स्वीकारला असता तर ५ वर्षांसाठी तेच मुख्यमंत्री राहिले असते. मी मुख्यमंत्री झालोच नसतो, असं समीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. एकनाथ शिंदेंसोबत सरकार स्थापन केलं नसतं, जे चाललंय ते चालू दे असं म्हणून थांबला असतात, तर आज एकहाती सत्ता स्थापन करता आली असती, असं वाटत नाही का?, या प्रश्नावर त्यांनी वरील उदाहरण देत आपली बाजू मांडली. आम्ही युतीचं राजकारण स्वीकारलं आहे. जोपर्यंत स्वबळावर निवडून येण्याची क्षमता होत नाही तोपर्यंत युतीचं राजकारण सुरू राहील, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.  

लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि सहयोगी संपादक यदु जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीसांनी एकूणच राजकीय विषयांवर सविस्तर संवाद साधला. ते म्हणाले की, "२०१४ साली आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली. त्यामुळेच आमची प्रगती झाली. तोपर्यंत भाजपाची ताकद काय हे जनतेलाही माहिती नव्हते आणि आम्हालाही माहीत नव्हते. त्यासाठी उद्धव ठाकरेंचे आभार मानेन, त्यांनी केवळ ४ जागांसाठी युती तोडली. १२७ जागांवर लढणाऱ्या भाजपाला २६० जागा लढता आल्या. त्यातील १२२ जागा निवडून आल्या. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष भाजपा पुढे आला. २०१४ च्या निवडणुकीनंतर आमची प्रगती झाली. कदाचित भविष्यात अशी संधी पुन्हा येईल."

उद्धव ठाकरें राजकीय विचार, वस्तुस्थितीचं भान ठेवून विचार करत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं. उद्धव ठाकरेंसोबत काम करणं मला कठीण गेले नाही. शेवटच्या काळात थोडं कठीण झाले. उद्धव ठाकरेंसोबत काम करताना काय अडचणी येतात हे महाविकास आघाडीला कळलं असेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. तुमच्यासोबत काम करणारे हे प्रॅक्टिकल विचार करणारे असतील, वस्तुस्थितीचे भान ठेवून निर्णय घेणारे असतील तर ते अधिक सोपे जाते. उद्धव ठाकरेंच्या तुलनेने एकनाथ शिंदे हे वस्तुस्थितीचे भान ठेवून, जमिनीवरील ज्ञान ठेवून निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे सोपे आहे, असं फडणवीस यांनी नमूद केलं. एकनाथ शिंदेंसोबत अनेक वर्षं काम केलं आहे. अजितदादा विरोधात होते त्यामुळे त्यांच्याशी तितका संबंध आला नव्हता, असंही ते म्हणाले. 

"राजकारणात कुणी कुणाला संपवू शकत नाही!"

राजकारणात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. मीदेखील कुणाला संपवू शकत नाही आणि कुणी मला संपवू शकत नाही. राजकारणात नेत्यांना फक्त जनता संपवू शकते. ही जनतेची ताकद आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन पुढे चालतोय त्यामुळे संपण्याचा विषय नाही. २०१९ ते २०२४ महाराष्ट्रातलं राजकारण जे झालंय ते पाहिल्यानंतर निवडून कोण येणार, सरकार कोण बनवतं अशाप्रकारे अनेक प्रश्न निर्माण होतात. यावेळी महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत जनता देईल असा विश्वास आहे, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.

अडीच वर्षाचा शब्द कुणाला बंद खोलीत दिला नाही, उघडही दिला नाही. कोणाला कुठलाच शब्द दिला नाही. निवडणूक झाल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते बसतील आणि कोण मुख्यमंत्री हे ठरवतील. माझी भूमिका निवडणूक समितीत असते. पुढील भूमिकेत माझा रोल नसतो. कोत्या मनाने वागण्यापेक्षा सरळ हाताने देणे गरजेचे असते. एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यपद्धतीने काम करतात. आम्हाला त्यांचं नुकसान होत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

राज ठाकरे मित्र, पण...

सध्या राज ठाकरे हे आमच्या महायुतीचा भाग नाहीत. व्यक्तिगत मैत्री असली तरी आघाडीचा भाग नाहीत. शिवडीसारख्या एका जागेवर आम्ही उमेदवार दिला नाही. तिथे मनसेचा उमेदवार आहे. भाजपाविरोधात ७० टक्के जागांवर मनसेचे उमेदवार आहेत. त्यामुळे लढाई आमची आहे. आमची लढाई थेट त्यांच्याशी नाही, कारण काही मुद्द्यांवर त्यांचे आणि आमचे एकमत आहे. विचार सारखे आहेत. ते त्यांचा पक्ष चालवताहेत. राज ठाकरे मत मागताना महायुतीसाठी मागणार नाहीत. ते आमच्या उमेदवाराविरोधात मत मागताहेत. त्यामुळे आमची लढाई निश्चित आहे असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी बंद दाराआड मनसेसोबत सध्या कुठलीही चर्चा नसल्याचं स्पष्ट केले.

पाहा व्हिडिओ

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahayutiमहायुतीBJPभाजपा