शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 12:54 IST

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी अदानींनी प्रयत्न केले, असा दावा मविआ नेत्यांकडून केला जात होता. मात्र त्यावर शरद पवारांनी खुलासा केला आहे. 

मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अदानींच्या नावाचा उल्लेख करून भाजपा महायुतीवर निशाणा साधला गेला. प्रचारात उद्धव ठाकरेंकडून वारंवार धारावी प्रकल्पाचा उल्लेख करून, मुंबई अदानींना विकायला काढल्याचा आरोप करण्यात आला. परंतु अदानींना धारावी प्रकल्पात इंटरेस्टच नव्हता, असा दावा शरद पवारांनी एका मुलाखतीत केला आहे. 

डिजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांनी भाजपा-राष्ट्रवादीची बैठक झाल्याचा उल्लेख केला. त्यात अमित शाह, गौतम अदानी असल्याचं म्हटलं गेले, त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, असा प्रश्न पवारांना विचारला. याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, हे काही नवीन नाही. या गोष्टीला ५ वर्ष झाली, लोकांना माहिती आहे. बैठकीचे खरे आहे, ते मी आधीच सांगितले. बैठकीसाठी मला काही नेत्यांनी विनंती केली होती. त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्यायचं होतं. शिवसेना-भाजपाचा वाद झाला होता त्यामुळे चर्चा करणे गैर काहीच नाही. राजकारणात संवाद महत्त्वाचा असतो. मी संवादावर विश्वास ठेवतो. त्यामुळे हे खरे आहे बैठक झाली होती. मी होतो, अजित पवार होते. बैठकीत आम्ही ऐकून घेतले आणि त्यानंतर आम्ही तुमचा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही, तुमच्याशी युती करू शकत नाही हे सांगितले होते.  

विधानसभा निवडणूक प्रचारात मुख्यत: धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि अदानी कनेक्शनवर हल्ला चढवला होता. हा मुद्दा निवडणुकीत लावून धरला जातोय असा प्रश्न पवारांना विचारला. मात्र त्या बैठकीत धारावी मुद्दा तिथे नव्हता. अदानींना टार्गेट करण्यासाठी मुद्दा वापरला जातोय, पण धारावी प्रकल्पात अदानींना इंटरेस्टच नव्हता, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. अदानी मुद्द्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही. मुंबईत विशेषतः धारावी वगळता महाराष्ट्रातील कुणीही या मुद्द्याकडे फारसे लक्ष दिले नाही, असं मत मांडून शरद पवारांनी काँग्रेस-उद्धव ठाकरेंची अप्रत्यक्षपणे कोंडीच केली. 

निवडणुकीला महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा रंग देण्याचा प्रयत्न

राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवले जात आहे. महाराष्ट्राला लुटलं जात आहे. धारावी प्रकल्प अदानींना देऊन मुंबई विकली जात आहे, असा प्रचार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून केला जात होता. त्याशिवाय या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा रंग देत महायुतीला आव्हान दिले आहे. ठाकरे गटाचे खासदार ऐन मतदानाच्या दिवशी 'महाराष्ट्राला अदानीराष्ट्र बनवायचा नसेल तर...' असं सांगत मतदारांना आवाहन करत आहेत. त्यात अदानी मुद्द्यांवरून शरद पवारांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारGautam Adaniगौतम अदानीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवार