शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

२०२४ च्या निकालानंतर काहीही घडू शकतं, अजितदादा किंगमेकर; नवाब मलिकांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 16:26 IST

नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द परिसरातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिथे त्यांची लढत समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांच्याविरोधात होणार आहे.

मुंबई - राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर काय घडणार याचा अंदाज कुणी बांधला होता का, तसेच २०२४ च्या निकालानंतरची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. परिस्थितीनुसार काहीही घडू शकते त्यात अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत असतील असा दावा आमदार नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरला मतमोजणीनंतर राज्यात २०१९  च्या निकालानंतरची पुनरावृत्ती घडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, २०१९ च्या निकालानंतर काय घडेल याचा अंदाज कुणी बांधला होता का, २०२४ च्या निकालानंतरही काही घडू शकते. अजित पवार किंगमेकर राहतील अशी खात्री आहे. मी जास्त भविष्यवाणी करू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील. आताच्या घडीला ही लढाई काटे की टक्कर अशी आहे. मोठा संघर्ष होणार आहे. सरकार कुणाचं येईल असा दावा कुणी करू शकत नाही. प्रचार जसजसा पुढे सरकत जाईल त्या परिस्थितीनुसार पुढे बघू असं त्यांनी सांगितले.

तसेच राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. परिस्थिती बदलत राहते. शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होतात असंही नवाब मलिकांनी सांगितले. तर माझा दहशतवाद्यांशी संबंध आहे, मी देशद्रोही आहे असं काहीजण म्हणतात. मी आतापर्यंत काही बोललो नाही कारण आमच्यावर निर्बंध होते. पण जो माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला उत्तर देण्याचा मला अधिकार आहे. बोलण्याचा अधिकार जसा असतो, तसा खोट्या आरोपांना उत्तर देण्याचा अधिकारही आहे  खोट्या आरोपांनी आम्ही घाबरत नाही. परंतु जे खोटेनाटे आरोप करतात त्यांच्याविरोधात कायदेशीर लढा देऊ असं नवाब मलिकांनी म्हटलं.

दरम्यान, मी ३ वेळा कुर्ल्यातून आमदार होतो, २ वेळा अणुशक्तीनगरमधून आमदार होतो. आता मी तिसऱ्या जागेवरून निवडणूक लढवतोय जो अणुशक्तीनगरच्या बाजूला आहे. मला निवडणूक लढायची नव्हती. मी जेलमधून सुटल्यानंतर माझ्या मुलीने मतदारसंघात काम पाहिले. मी कार्यालयात बसल्यानंतर लोक तिला भेटायला यायचे. त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही तिला उभं करू हे ठरवले. मात्र मागील ३-४ महिन्यापासून शिवाजीनगर मानखुर्दची लोक मला भेटायला येत होते. मी निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह होता. आज या मतदारसंघात ड्रग्सचा विळखा आहे. गुंडाची दहशत आहे. लोक दहशतीत जगतायेत असं लोक म्हणाले. पण मीच का असा विचारले असता याआधी जे कुणी निवडणूक लढवत होते, त्यांना दहशत दाखवून, खोटे गुन्हे दाखल करून बाजूला सारले जाते. धमक्या आल्यानंतर ते गायब होतात. त्यामुळे तुम्ही कुठेतरी ताकदीने लढाल असा तिथल्या लोकांना विश्वास आहे म्हणून मी या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे असंही नवाब मलिकांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mankhurd-shivaji-nagar-acमानखुर्द शिवाजी नगरanushakti-nagar-acअणुशक्ती नगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिकBJPभाजपा