शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 22:55 IST

Ajit Pawar On Gautam Adani : गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २४ तासांमध्येच  गौतम अदानींबाबत केलेल्या वक्तव्यावरून  घुमजाव केलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सरकारच्या स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत गौतम अदानी हजर होते, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता. त्यानंतर आता गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या या युटर्नची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.

जपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील बैठकांमध्ये गौतम अदानी यांचाही सहभाग होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत सांगताना अजित पवारांनी एका मुलाखतीत बोलताना हे विधान केलं. अजित पवार यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र आता अदानींचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा होऊ लागल्याने त्यांनी युटर्न घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीसाठी पाच बैठका झाल्या होत्या. मी पुन्हा सांगतो अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार या बैठकीला होते. या बैठकीत भाजपत जाण्यासाठी चर्चा झाली होती. सर्व ठरलं होतं. पण त्या घटनेची जबाबादारी माझ्यावर आली आहे. ती जबाबदारी घेतली आहे. बाकी सर्वांना मी सुरक्षित केलं आहे,” असं अजित पवार यांनी मुलाखतीदरम्यान, म्हटलं होतं. 

गौतम अदानींबाबत केलेल्या या खुलाशांतर त्यांना याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी नव्हते एवढंच उत्तर दिलं होतं. त्यानंतर बीडमध्ये बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलं. गौतम अदानी यांच्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा ध चा मा केला जात आहे. त्यांचा राजकारणाचा काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.

मी अनेक उद्योगपतींच्या घरी जातो - शरद पवार

"गौतम अदानी नव्हे तर मी अनेकांच्या घरी जातो. रतन टाटा असो वा किर्लोस्कर यांच्याही घरी जातो. आजही जातो. अदानी यांची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आहे. आणखी काही प्रकल्प काढण्याचा अदानींचा विचार आहे. महाराष्ट्रातील त्यांची गुंतवणूक जेव्हा मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा गोंदिया भंडारा परिसरात त्यांनी प्रकल्प सुरू केले त्याचे उद्घाटन मीच केले होते. त्या भागात कोळशाच्या खाणी विकसित करण्याचा विचार होता. त्यात त्यांनी लक्ष घातलं. केंद्र सरकारने ते काम त्यांना दिले. त्यावेळी भाजप सरकार नव्हते. ते काम त्यांनी पूर्ण केले. त्याचे काही कार्यक्रम होते तेव्हा मी स्वत: गोंदियाला गेलो होतो. त्यामुळे जे महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात काम करू इच्छितात अशांच्या कामांना गती देणे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे या गोष्टी राज्य म्हणून गरजेच्या असतात," असं शरद पवार यांनी म्हटलं.

"अजित पवारांनी सांगितलेली एकही गोष्ट सत्य नाही. निवडणुकीचा कालावधी सोडल्यानंतर कधीही केंद्रातले मंत्री असो वा उद्योजक भेटत नाहीत असं मी कधी म्हणणार नाही. अनेकवेळा अजित पवारांना सोबत घेऊन मी अनेकदा भेटी घेतल्या जेणेकरून त्यांना माहिती व्हावी. देशाचे गृहमंत्री यांना मी एकदा काय, ३-४ वेळा भेटलो असेल. शिष्टमंडळ घेऊन भेटलोय. संवाद ठेवणे, भेट घेणे यातून काही कारस्थान होतंय असं म्हणण्यात काही अर्थ नाही," असंही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारGautam Adaniगौतम अदानीSharad Pawarशरद पवार