शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मनसेचा 'दस का दम'; राज ठाकरेंच्या इंजिनाला इंधन देणारे आकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 9:05 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाची काहीशी निराशा करणारे तर विरोधी पक्षांचे मनोबल वाढवणारे ठरले आहेत.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाची काहीशी निराशा करणारे तर विरोधी पक्षांचे मनोबल वाढवणारे ठरले आहेत. एकीकडे भाजपा आणि शिवसेना महायुतीची सत्ता आली तरी त्यांचे सभागृहातील संख्याबळ घटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे संख्याबळ बऱ्यापैकी वाढले आहे. राज ठाकरे यांच्या मनसेसाठीही ही निवडणूक किंचीत दिलासा देणारी ठरली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील यांच्या रूपात मनसेचा आमदार विधानसभेत पोहोचला आहे. सोबतच इतर काही ठिकाणी मिळालेली मते मनसेचा आत्मविश्वास वाढवणारी आहेत. मनसेला केवळ एका जागेवर विजय मिळाला असला तरी राज्यातील अन्य काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले आहेत. संतोष नलावडे (शिवडी), संदीप देशपांडे (माहीम), नयन कदम (मागाठाणे), संदीप जळगावकर (भांडूप पश्चिम) हर्षला चव्हाण (मुलुंड प.), अविनाश जाधव (ठाणे), मंदार हळबे (डोंबिवली) शुभांगी गोवरी (भिवंडी ग्रामीण), किशोर शिंदे (कोथरूड) या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्याबरोबरच काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले. 

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. दरम्यान, निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेच्या चढाओढीवरून कुरघोडी सुरू झाली आहे. तसेच शिवसेना भाजपाला सत्तावाटपाच्या ५०-५० फॉर्म्युल्याची सतत आठवण करून देत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे