शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त, मुख्यमंत्र्यांनी दिली प्रमाणपत्रे, निकषात बसणा-या सर्व शेतक-यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:46 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत गुरुवारी ८ लाख ४० हजार शेतक-यांना ४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.

- विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत गुरुवारी ८ लाख ४० हजार शेतक-यांना ४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. निवडक शेतक-यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या योजनेच्या निकषात बसणाºया सर्व शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कर्जमाफी सन्मान सोहळ्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सहकारमंत्री सुभाष देशमुख, मुख्य सचिव सुमित मल्लिक उपस्थित होते.जलयुक्त शिवारचा फायदानरक चतुर्दशीपासून पात्र शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येत असून, पहिल्याच दिवशी ४ लाख ६२ हजार शेतकºयांचे कर्जमाफ करण्यांत आले.ही रक्कम ३ हजार २०० कोटी रुपये इतकी आहे, तर नियमित कर्ज परतफेड करणाºया ३ लाख ७८ हजार शेतकºयांना प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात आली. त्याची एकत्रित रक्कम ८०० कोटी रुपये असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.जलयुक्त शिवारमुळे २० लाख हेक्टरचे सिंचन क्षेत्र निर्माण झाले असून, राज्याचे कृषी उत्पन्न हे ४० हजार कोटी रुपयांनी वाढले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची नावे आणि त्यांचे किती कर्ज माफ करावयाचे आहे, याची यादी राज्य शासनाकडून दरदिवशी बँकांकडे पाठविली जाणार आहे. कर्जमाफीचे कुणाचे फॉर्म चुकले असतील, तर ते रद्द केले जाणार नाहीत. त्रुटी दूर करून पुन्हा शेतकºयांकडून भरून घेतले जातील आणि कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.कापसाची खरेदी सुरू : सरकारची कापूसखरेदी आज सुरू झाली. शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून, तो सरकारी केंद्रावर जादा भावाने विकण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.निकषात बसणा-या शेवटच्या शेतक-यास कर्जमाफी मिळत नाही, तोवर ही योजना सुरूच राहील. कर्जमाफीचा प्रारंभ झाल्याने, आमच्या सरकारसाठी कर्तव्यपूर्तीचा आजचा दिवस ऐतिहासिक आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस