शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त, मुख्यमंत्र्यांनी दिली प्रमाणपत्रे, निकषात बसणा-या सर्व शेतक-यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:46 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत गुरुवारी ८ लाख ४० हजार शेतक-यांना ४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.

- विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत गुरुवारी ८ लाख ४० हजार शेतक-यांना ४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. निवडक शेतक-यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या योजनेच्या निकषात बसणाºया सर्व शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कर्जमाफी सन्मान सोहळ्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सहकारमंत्री सुभाष देशमुख, मुख्य सचिव सुमित मल्लिक उपस्थित होते.जलयुक्त शिवारचा फायदानरक चतुर्दशीपासून पात्र शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येत असून, पहिल्याच दिवशी ४ लाख ६२ हजार शेतकºयांचे कर्जमाफ करण्यांत आले.ही रक्कम ३ हजार २०० कोटी रुपये इतकी आहे, तर नियमित कर्ज परतफेड करणाºया ३ लाख ७८ हजार शेतकºयांना प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात आली. त्याची एकत्रित रक्कम ८०० कोटी रुपये असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.जलयुक्त शिवारमुळे २० लाख हेक्टरचे सिंचन क्षेत्र निर्माण झाले असून, राज्याचे कृषी उत्पन्न हे ४० हजार कोटी रुपयांनी वाढले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची नावे आणि त्यांचे किती कर्ज माफ करावयाचे आहे, याची यादी राज्य शासनाकडून दरदिवशी बँकांकडे पाठविली जाणार आहे. कर्जमाफीचे कुणाचे फॉर्म चुकले असतील, तर ते रद्द केले जाणार नाहीत. त्रुटी दूर करून पुन्हा शेतकºयांकडून भरून घेतले जातील आणि कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.कापसाची खरेदी सुरू : सरकारची कापूसखरेदी आज सुरू झाली. शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून, तो सरकारी केंद्रावर जादा भावाने विकण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.निकषात बसणा-या शेवटच्या शेतक-यास कर्जमाफी मिळत नाही, तोवर ही योजना सुरूच राहील. कर्जमाफीचा प्रारंभ झाल्याने, आमच्या सरकारसाठी कर्तव्यपूर्तीचा आजचा दिवस ऐतिहासिक आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस