शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 16:02 IST

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा बाकी असून आता ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जूनला पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान संपले असून आता ४ जूनच्या निकालाची सर्व प्रतिक्षा करत आहेत. राज्यात ४८ जागांसाठी मतदान पार पडलं. याठिकाणी महायुतीविरुद्धमहाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली. मात्र राज्यात निकालाआधीच अनेक उमेदवारांनी जिंकण्याचे दावे केले आहेत. काही उमेदवारांच्या विजयाचे पोस्टर्सही झळकल्याचं समोर आलं आहे.

त्यातच लोकनीती-सीएसडीएसचे प्रोफेसर आणि राजकीय विश्लेषक संजय कुमार यांनी जी भविष्यवाणी केली आहे. त्याने अनेकांची झोप उडाली आहे. न्यूज तकशी बोलताना प्रोफेसर संजय कुमार यांनी महाराष्ट्राच्या लोकसभा निकालांची भविष्यवाणी केली आहे. हा निकाल हैराण करणारा आहे. संजय कुमार यांच्या भविष्यवाणीनुसार राज्यातील भाजपाला मोठा धक्का बसत आहे. कारण याठिकाणी भाजपाचं मिशन ४५ अपयशी ठरणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काय आहे भविष्यवाणी?

महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. २०१९ च्या तुलनेत काँग्रेसला जास्त यश मिळेल. तर जागांच्या बाबतीत भाजपाची कामगिरी निराशाजनक असेल. काँग्रेसला यंदा प्रादेशिक पक्षांचे समर्थन अधिक मिळालं. महाविकास आघाडी राज्यात २५-२६ जागा जिंकण्याची शक्यता आहे तर महायुतीला एकूण २१ ते २२ जागा मिळू शकतात. मागील लोकसभा निवडणुकीत NDA नं महाराष्ट्रात ४८ जागांपैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे याठिकाणी एनडीएला फटका बसताना दिसत आहे. 

कुणी किती जागा लढल्या?

महायुतीचं बोलायचं झालं तर भाजपानं २८ जागांवर निवडणूक लढली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने १५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ४ जागांवर उमेदवार उभे केले होते. महायुतीनं राष्ट्रीय समाज पक्षाला १ जागा दिली होती. तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वाधिक २१ जागा लढवल्या. त्यानंतर काँग्रेसनं १७ जागांवर निवडणूक लढवली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागांवर निवडणूक लढवली आहे.  

पक्षफोडीमुळे भाजपाला नुकसान?

२०१९ ला राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. मुख्यमंत्रि‍पदावरून शिवसेना-भाजपाचं बिनसल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता काबीज केली. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात फूट पडली. शिंदेसोबत पक्षातील ४० आमदार, १२ खासदार बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही दावा सांगितला. निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदेंकडे शिवसेना सोपवली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे या निवडणुकीत मशाल चिन्ह घेऊन मैदानात उतरले. तर २०२२ मध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत फूट पडली. तिथेही घड्याळ चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवारांना मिळालं. त्यामुळे राज्यातील २ मोठ्या प्रादेशिक पक्षात फूट पडल्यानं स्थानिक जनतेमध्ये रोष असल्याचं दिसून आलं होते. त्यामुळे या पक्षफोडीमुळे भाजपाचं नुकसान होणार असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी