शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चर्चेला मर्यादा असतात, किती चर्चा करायची?; नाराज काँग्रेसला संजय राऊतांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 14:08 IST

Uddhav Thackeray vs Congress : उमेदवार यादीवरून आता महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहे. ठाकरेंच्या उमेदवार यादीवर काँग्रेसने आक्षेप घेत निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. त्यानंतर राऊतांनीही काँग्रेस नेत्यांना फटकारलं आहे. 

मुंबई - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) चर्चेला मर्यादा असतात. ती चर्चा आमच्या दृष्टीने थांबलेली आहे असं आम्हाला वाटते. काँग्रेसने उमेदवार जाहीर केले त्यात रामटेकसुद्धा आहे. मग आम्ही आक्षेप घेतला का? पंतप्रधान कोणाला व्हायचं तर काँग्रेसचा होणार आहे. आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जागा कुठे मागतो तर प्रादेशिक पक्ष म्हणून राज्यात जागा मागतोय. राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ तिथे काँग्रेससमोर कुणीच नाही. तिथे जागा मागतोय का? महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते आहेत. त्यांचे स्वत:चे स्थान आहे. प्रादेशिक पक्ष राहिले, टिकले तर पंतप्रधान काँग्रेसचाच होणार आहे अशा शब्दात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना फटकारलं. 

संजय राऊत म्हणाले की, जागावाटपावर गेल्या दोन अडीच महिन्यापासून चर्चा करतोय. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचेही काही मतदारसंघ आहे. फक्त आम्हाला अस्तित्व हवं म्हणून कुठे जागा मागावी हे आघाडीत योग्य नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात. मागच्या लोकसभेत काँग्रेसकडे एकही जागा नव्हती. राज्यात काँग्रेस केवळ एका जागेवर निवडून आली होती. एका जागेवरून १६ जागांवर काँग्रेस लढतेय. तिथे १० जागांवर जिंकणार आहे मग काँग्रेस शरण गेली असं कसं म्हणू शकतो? पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही. रामटेकची जागा जिथे २५ वर्ष शिवसेना जिंकते. मग तिथे आम्ही शरण गेलो असं म्हणू का? असा सवाल त्यांनी केला. 

तसेच आम्हाला एकत्र काम करायचे आहे. कोल्हापूर आमच्या हक्काची जागा आहे. ३० वर्ष आम्ही तिथे लढतोय आणि जिंकतोय. आता तिथे शाहू महाराज लढतायेत मग ते ज्या पक्षाचे चिन्ह घेतील त्यांना ती जागा सोडू. मग आम्ही मविआमध्ये काँग्रेसला ती जागा सोडली. मग आम्ही जाऊन सोनिया गांधींकडे तक्रार करायची का? हातकणंगले जागेवर राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे. ती जागादेखील आमची जातेय. मग पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला एक जागा आम्ही घेत असू तर महाविकास आघाडीने त्याचा स्वीकार केला पाहिजे. दिल्लीतील वरिष्ठ नेते समजून घेतील. उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्न नाही असं ठामपणे राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात. आता काँग्रेसला वाटत असेल ४८ जागांवर लढू तर त्या भावना असतात. आमचीही ४८ जागांची तयारी आहे. परंतु आघाडी केल्यावर आशा-निराशेचा खेळ होतो.  आम्ही वंचितला जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न केला. चर्चा सुरू राहिली असती तर ६ जागाही दिल्या असत्या. आमचे मन साफ होतो. राजकीय व्यवहार पारदर्शक होता. वंचित, शोषित जनता या लढाईत आमच्यासोबत राहावी ही आमची भूमिका होती. शेवटी डॉ. आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे. त्यामुळे जर अप्रत्यक्ष कुणी भाजपाला मदत होईल अशी भूमिका घेत असेल तर राज्यातील जनता त्यांना स्थान देणार नाही असं राऊतांनी वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयावर म्हटलं. 

देशात काँग्रेसचा पंतप्रधान करणं हे आमचं धोरण  

जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे. आकडे वाढवण्यासाठी कुणी जागा लढवत नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातले आणि देशातील नेते आहेत. ते १० जागा लढतायेत. सगळ्यात मोठे नेते शरद पवार आहे. काँग्रेस देशात मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रात त्यांची ताकद तिथेच त्यांनी लढले पाहिजे. शिवसेना-राष्ट्रवादीबाबत जे राजकारण घडलं, त्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती आहे. त्याचा फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ, देशात काँग्रेसचा पंतप्रधान बसवायचा हे आमचं धोरण आहे असं संजय राऊतांनी म्हटलं.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसSangliसांगली