शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मत विभाजनाचं पाप करू नका, काँग्रेसचं वंचित बहुजन आघाडीला पुन्हा आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 21:36 IST

सर्वधर्म समभावाची प्रेरणा घेऊन देश पुढे जात असताना भाजपाने त्याला छेद दिला. देश सध्या कठीण प्रसंगातून जात आहे, देशाला कमजोर केले जात आहे अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

भंडारा - Nana Patole on Prakash Ambedkar ( Marathi News ) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औवेसींच्या एमआयएम व वंचितने मतविभाजन केल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. आजची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. मतविभाजनाचे पाप करु नका, असे आवाहन पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्याप्रकाश आंबेडकर यांना केले.   

भंडारा गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या भंडारा येथील प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की, भाजपा सत्तेत आले तर २४ तासात ओबीसी आरक्षण देतो अशी वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण आरक्षण काही दिले नाही. भटक्या जाती, आदिवासी यांना संपवण्याचे काम भाजपा करत आहे. राहुल गांधी यांनी न्याय यात्रेत जनतेशी संवाद साधला, यातूनच ५ न्याय २५ गॅरंटी बनवल्या आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात महिला, तरुण, शेतकरी, कामगार, व हिस्सेदारी असे ५ न्याय दिले आहेत. काँग्रेसचे ५ न्याय व २५ गॅरंटी हे घरोघरी पोहचवण्याचे काम करा. काँग्रेसच्या गॅरंटीची चायना माल अशी टिंगल भाजपा करत आहेत. कोरोनाचे संकट पाहून तातडीने उपाय करण्याचा सल्ला राहुल गांधी यांनी दिला होता त्याचीही भाजपाने अशीच टिंगळटवाळी केली होती, आताही तेच सुरु आहे अशी टीका त्यांनी केली. 

तर भाजपाने केवळ हिंदू-मुस्लीम समाजात भांडणे लावून शांतता बिघडवण्याचे काम केले तर राहुल गांधी यांनी समाजात एकोपा रहावा यासाठी भारत जोडो यात्रा काढली. सर्वधर्म समभावाची प्रेरणा घेऊन देश पुढे जात असताना भाजपाने त्याला छेद दिला. देश सध्या कठीण प्रसंगातून जात आहे, देशाला कमजोर केले जात आहे. मोदी सरकार पुन्हा आले तर निवडणुकाही होणार नाहीत, हा धोका टाळण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार हटवून इंडिया आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले. त्याचसोबत देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते पण त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, केंद्र सरकार नोकर भरती करत नाही, कंत्राटी पद्धतीने पदे भरत आहेत तर दुसरीकडे लाखो तरुण नोकरीपासून वंचित आहेत. महागाई कमी केली नाही, १५ लाख रुपये खात्यात जमा करणार अशा गॅरंटी दिल्या पण या सर्व मोदी गॅरंटी खोट्या निघाल्या असा आरोप त्यांनी केला. 

भाजपाचं सरकार आल्यास लोकशाहीचा अस्त होईल

दरम्यान, भाजपा हा काँग्रेस पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. इन्कम टॅक्सच्या नोटीस पाठवल्या जात आहेत, त्याच नियमाप्रमाणे भाजपाला नोटीस पाठवली तर ५ हजार कोटी रुपये वसुल करावे लागतील. काँग्रेस पक्ष हा महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन वाटचाल करत आहे, ते भाजपाला चालत नाही, राज्यघटना बदलण्याचा त्यांचा डाव आहे. नरेंद्र मोदींनी जनतेला खूप आश्वासने दिली पण शेवटी काय झाले, ज्याला नेता समजले तो अभिनेता निघाला. भारतीय राजकारणावर मोठं संकट आले आहे, भाजपाचे पुन्हा सरकार आले तर लोकशाहीचा अस्त होईल व तानाशाही सुरु होईल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना संपुष्टात येईल असं खासदार मुकुल वासनिक म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर