शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत बांधावर - दिवाळीत दिवाळे निघाले, आता कर्ज कसे फेडायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 05:47 IST

ज्वारी, मका व कापसाचे सर्वाधिक नुकसान

राज्यात अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांची तसेच द्राक्ष, केळी, डाळींब आणि संत्रा बागांची प्रचंड नासाडी झाली. यंदा चांगला पाऊस झाल्याने दिवाळी आनंदात साजरी करता येईल या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. या नुकसानीमुळे बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच महाराष्टÑावर कोसळलेल्या या नैसर्गिक आपत्तीने सगळेच हवालदिल झाले आहेत. राजकीय नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. सरकारने नुकसान भरपाई देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, ती मिळेल तेव्हा खरे.

अशा परिस्थितीत ‘लोकमत’चे प्रतिनिधी थेट शेतकºयांच्या बांधावर जावून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. शेतकºयांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.ज्वारी, मका व कापसाचे सर्वाधिक नुकसानजळगाव : अवकाळी पावसामुळे खान्देशात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील १६ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक सात लाख १९ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे.खान्देशातील शेतकरी हवालदिल : चिखलातून वाट काढत महसूलची पंचनाम्यासाठी कसरतवर्षभरात शेतात ओतलं अन् अतिवृष्टीने पाण्यात घातलंएल. डी. वाघमोडे/अंबादास वायदंडे ।माळशिरस/ सुस्ते : लाखाचे बारा हजार कसे होतात याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना आला आहे. दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून पिके घेतली आणि अतिवृष्टीने तिच पिकं पाण्यात घातल्याची स्थिती आता निर्माण झाली आहे. माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील बाजरी आणि कांदा पिके पाण्याखाली आहेत. सडलेल्या पिकांना पाहताना शेतकºयांचा जीव खालीवर होत आहे.अजनसोंड येथील शेतकरी मारुती बापूराव घाडगे यांनी सात एकरात माडा कांद्याची लागवड केली़ तेव्हापासून आतापर्यंत ४ लाख ५० हजार रुपये खर्चही केला़ परतीच्या पावसाने थैमान घातले आणि होत्याचे नव्हते झाले़ सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ३० ते ३५ लाख रुपयांच्या कांद्याचे उत्पन्न मिळाले असते,भांब (ता. माळशिरस ) येथील शेंडगे यांची ४ एकरातील बाजरी काढणीला येताच सुरू झालेल्या पावसात अवघी ६ पोती काळपट रंगाची बाजरी पदरात पडली.दिवाळीत दिवाळे निघाले, आता कर्ज कसे फेडायचे?द्राक्ष उत्पादक शेतकºयांचा सवालसंजय वाघ ।नाशिक : संपूर्ण कुटुंबाने जीवाचे रान करुन पोटच्या पोरासारख्या जगविलेल्या बागेत निर्यातीसाठी योग्य ठरेल, अशा उच्च प्रतीचा द्राक्षे तयार झालेली होती. त्याची निर्याय करुन कर्जफेडीसह हातात आगामी वर्षासाठी खेळते भांडवल राहील असे स्वप्न पाहत असताना परतीच्या पाऊस काळ बनून आला आणि सर्व होत्याचे नव्हते करून गेला. आता सरकारने अधिक अंत न पाहता एकरी एक लाख रूपये भरपाई दिल्यास पुढच्या वर्षाची तयारी तरी करता येईल, अशी आपबिती पिंगळवाडे शिवारातील द्राक्ष उत्पादक शेतकरी रवींद्र भामरे कथन करीत होते.बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे शिवारात भामरे यांची पावणेचार एकर द्राक्षांची बाग आज मरणासन्न अवस्थेत उभी आहे. बागेतून कुजका वास येत होता. एकरी दोन ते सव्वा दोन लाख रुपये खर्च याप्रमाणे साधारणपणे आठ लाख खर्च करून भामरे यांनी बाग जगविली होती.परतीच्या पावसाने दिवाळे काढले आणि बागेसाठी पाहिलेले स्वप्न अंध:कारमय झाले. वडिलांनी घेतलेले कर्ज माथ्यावर थकीत असताना जिल्हा बॅँकेकडून घेतलेले साडेचार लाख तसेच खासगी सावकारांकडून घेतलेले दोन ते तीन लाखांचे कर्ज कोणाच्या भरवशावर फेडायचे असा उद्विग्न सवाल भामरे यांनी केला.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीLokmatलोकमतfarmer suicideशेतकरी आत्महत्या