शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 08:27 IST

Loksabha Election - ठाणे कळवा इथं झालेल्या राज ठाकरेंच्या सभेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर आक्रमक टीका करण्यात येत आहे. त्यात आव्हाडांनीही राज यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. 

ठाणे - Jitendra Awahad on Raj Thackeray ( Marathi News ) राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट दिसतोय, ही आग लावण्याची कामे बंद करा, समाज इतका मूर्ख राहिलेला नाही. समाजालाही कळतं अशा शब्दात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर आगपाखड केली आहे. 

कळवा येथील सभेत राज ठाकरेंनी मुंब्रा येथे सापडलेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी सांगितली. त्यासोबतच फोडाफोडीच्या राजकारणावर शरद पवारांवर निशाणा साधला. त्याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, परप्रांतीय आणि मुस्लीम यांना टार्गेट करून तुम्हाला मराठी मते मिळतील असं होत नाही. महिलांना गॅसदरवाढीचा त्रास होतोय, महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल भरताना चारचाकी चालवणाऱ्या मराठी माणसाला किती त्रास होतो याबद्दल बोलावं, केवळ मारझोडीचं राजकारण ही महाराष्ट्राची अपेक्षा नाही असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय महायुतीचा प्रचार करताना राज यांनी कुठलाही नवीन मुद्दा पुढे आणला नाही. काही खास बोलले नाहीत. ज्या विषयावर ते कायम बोलत आलेत म्हणून त्यांची एकही जागा निवडून येत नाही. त्याच विषयावर बोलतात. मुस्लीमांना सरळ केले पाहिजे. परप्रांतीयांना सरळ केले पाहिजे. शिवसेनेच्या या दोन्ही जागा पडतील यासाठी राज यांना कुणी सुपारी दिलीय का असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी केला. 

दरम्यान, हिंदू-मुसलमान, परप्रांतीयविरुद्ध मराठी अशी भांडणेच महाराष्ट्रात करत बसायची का? देशाची आर्थिक परिस्थिती कशी, बेरोजगारी, महागाई, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा निर्देशांक कुठे गेलाय, भूकेत आपण कुठे आहोत. श्रीमंतीत आपण कुठे आहोत, गरीब कोण झालेत, गरिबांच्या हाती भारतातील किती श्रीमंती आहे. शेती, उद्योग या विषयावर कधी बोलणार? फक्त मुसलमान आणि परप्रांतीय यावर किती दिवस बोलाल? मराठी मुलांना नोकऱ्या नाहीत त्यावर बोला. केंद्र सरकारने उद्योगधंदे गुजरातला नेले त्यावर बोलाल? इलेक्टोरल बॉन्डद्वारे जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दल बोलाल? यासारखे विविध प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना विचारले. 

टॅग्स :thane-pcठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडRaj Thackerayराज ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४