शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 16:09 IST

loksabha Election - २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर महायुतीतील मित्रपक्षातील अंतर्गत कलह समोर येत आहेत. 

मुंबई - महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक संपताच महायुतीच्या मित्रपक्षातील अंतर्गत कलह समोर येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही कार्यकर्त्यांनी प्रचार न केल्याचा आरोप केला आहे तर बारणे त्यांनी स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप लावू नये असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दिले आहे.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, मतदारांमध्ये श्रीरंग बारणे यांच्याविरोधात असंतोष होता हे सत्य श्रीरंग बारणे यांना स्वीकारावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटानं बारणे यांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. बारणे यांनी स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आमच्या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर आरोप किंवा त्यांच्यावर टीका करू नये असं त्यांनी म्हटलं.

दुसरीकडे मुंबई उत्तर पश्चिममध्ये अप्रत्यक्षपणे गजानन किर्तीकर ठाकरेंच्या बाजूने विधाने करत असल्याने एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना उपनेते शिशीर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खासदार गजानन किर्तीकर यांच्या पक्षविरोधी विधानांची दखल घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. 

खासदार गजानन किर्तीकर सातत्याने मतदानानंतर विरोधी वक्तव्ये करत उद्धव ठाकरेंची बाजू घेत आहेत. मातोश्रीचे लाचार असणाऱ्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाने मुंबई उत्तर पश्चिमची उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकीत अमोल किर्तीकर वडिलांच्या कार्यालयाचा वापर त्याच्या प्रचारासाठी करत असल्याचं आरोप करण्यात येत आहे. गजानन किर्तीकर यांच्या पत्नीनेही मुख्यमंत्र्याबाबत अपमानास्पद विधान केले असंही पत्रात म्हटलं आहे. 

दरम्यान, गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्या घरातील राजकीय वातावरण पाहिले तर ते एका साईडला आहेत. यावेळी शांततेची भूमिका घ्यायला हवी होती, स्थानिक पातळीवर बोलणे योग्य, त्यांच्या बोलण्याने चर्चा करायला वाव मिळू नये त्यांनी असे भाष्य करू नये. घरातील वादविवादाने मानसिक त्रास होतो. त्यांचं ऑपरेशन झाले तेव्हा एकनाथ शिंदे भेटायला गेले होते. आम्ही भावनिक नातं जपतो. या विषयावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केले आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती