शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Lok Sabha Elections 2024: मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा; सर्वाधिक जागा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 12:35 IST

पुढील लोकसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. 

मुंबई - अलीकडेच राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. मविआच्या या विजयानंतर काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी नेत्यांनी आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याची माहिती समोर येत आहे. 

सूत्रांनुसार, ४८ जागांपैकी ठाकरे गटाला २१, राष्ट्रवादी १९ तर काँग्रेस ८ जागांवर निवडणूक लढवेल असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील ६ जागांपैकी ठाकरे गटाला ४ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा लढवण्यास मिळू शकते. लोकसभा निवडणुकीला १ वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे या निवडणुकीत जास्तीत जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ जागांपैकी ५-६ जागा अशा आहेत त्याठिकाणी महाविकास आघाडीचे एकमत झाले नाही. त्यासाठी या जागांवर बदल होऊ शकतो. भाजपाने तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीत मिशन ४५ हाती घेतले आहे. त्यानुसार राज्यभरात ठिकठिकाणी भाजपा नेते कामाला लागले आहेत. त्याचसोबत केंद्रीय मंत्र्यांवरही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसनं फेटाळली चर्चा

दरम्यान, महाविकास आघाडीत कुठलाही जागावाटप फॉर्म्युला ठरला नाही. ही सर्व हवाई पुलाव आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नाही. मी २ दिवसांत दिल्लीला जाणार आहे. या सर्व चर्चा केंद्रीय नेतृत्वासमोर करू. मग महाराष्ट्रात पुढे काय करायचं यावर आम्ही येथील नेत्यांमध्ये चर्चा करू. परंतु जागावाटपाबाबत काही ठरले नाही असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही चर्चा फेटाळली आहे. 

२०१९ च्या लोकसभेचं गणित काय?महाराष्ट्रात ४८ जागांवर २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपा एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले होते. २०१९ मध्ये ४८ पैकी २३ जागांवर भाजपाने विजय मिळवला तर १८ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. तर राष्ट्रवादीने ४ जागा आणि काँग्रेसने १ जागेवर विजय मिळवला. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. त्यात शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यावर भाजपाची नजर आहे. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त निवडून आणण्याचे टार्गेट पक्षातील नेत्यांना दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची प्रत्येक योजना सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहचवा असं निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील नेत्यांना दिले आहेत. पुढील लोकसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस