शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

...तेव्हा मनसेची भाजपासोबत युती होईल; आदित्य ठाकरेंचं विधान, भाजपावर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 19:23 IST

loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसे-भाजपासोबत महायुतीत सामील होईल अशी चर्चा सुरू होती. त्यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला होता. 

यवतमाळ - Aaditya Thackeray on MNS-BJP ( Marathi News )  आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजपा युती होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु अलीकडेच युतीच्या चर्चांना ब्रेक लागला. मात्र यावर माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मनसे-भाजपात युती होईल असं त्यांनी म्हटलं. 

यवतमाळमध्ये पत्रकारांनी मनसे-भाजपा युतीवर प्रश्न विचारला तेव्हा आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, उत्तर प्रदेशातील २ टप्प्यानंतर मनसेला सोबत घेतले जाईल अशी भाजपाकडून चर्चा आम्हाला ऐकायला आलीय असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत आदित्य ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही जाहीर केलेत. महायुतीत ईडी, सीबीआय, भ्रष्टाचारांची गँग आहे तिथे जागावाटपावरून बोली सुरू आहे. मिंदे गटातील ४-५ उमेदवार बदलणार अशी चर्चा आहे. अजून पुढे अनेक गोष्टी ऐकायला मिळतील. आमची निष्ठा महाराष्ट्राची आणि देशाची आहे. देशहित, महाराष्ट्र हित बघून आम्ही पुढे चाललोय असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय आम्ही सर्वसामान्यातले आहोत. आमच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना तरुण मंडळींना सोबत घेऊन वरिष्ठांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललोय. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना-राष्ट्रवादीबाबत जो निर्णय दिला तो पाहिला तर देशात संविधान बदलण्याचे संकेत मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बाजूला ठेवून भाजपाचे संविधान देशावर लादायचं आहे. हे आम्ही करून देणार नाही. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक झाली. Join किंवा Jail अशी ऑफर येत आहे. त्यातून जगभरात भारताची बदनामी होतेय. ईडी, सीबीआय कारवाईतून देश बदनाम होतोय. त्यामुळे इंडिया आघाडीची वज्रमूठ बाहेर आली आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी भाजपावर केली. 

दरम्यान, आताच मिंदेंनी दिलेले उमेदवार बदलायला सांगितले आहेत, त्यातून पुढे ४० गद्दारांनी विचार करावा. महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं आहे. राज्यात असं राजकारण कधीच झालं नव्हतं, जातीधर्मात भांडणं लावली जातेय. पक्ष पोडणे, कुटुंब फोडणे यातून महाराष्ट्रात मिळवलं काय? अडीच वर्षात एकही उद्योग राज्यात आणला नाही. शेतकरी त्रस्त आहे. मग हे राजकारण कुणासाठी आणलं? आमची राज्यासाठी जी तळमळ आहे, देशात जे राजकारण सुरू आहे. ५० वर्षापूर्वी जे झाले तो इतिहास आहे, भविष्यावर बोलणार की नाही. काँग्रेसनं काय केले यावर प्रचार सुरू आहे. आपण ज्या पदावर आहोत तिथे पुढे देशासाठी काय करणार याचा विचार करायला हवा असं सांगत आदित्य ठाकरेंनी काँग्रेसवरील आरोपांना उत्तर दिले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेMNSमनसेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी