शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

...तेव्हा मनसेची भाजपासोबत युती होईल; आदित्य ठाकरेंचं विधान, भाजपावर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 19:23 IST

loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसे-भाजपासोबत महायुतीत सामील होईल अशी चर्चा सुरू होती. त्यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला होता. 

यवतमाळ - Aaditya Thackeray on MNS-BJP ( Marathi News )  आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजपा युती होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु अलीकडेच युतीच्या चर्चांना ब्रेक लागला. मात्र यावर माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मनसे-भाजपात युती होईल असं त्यांनी म्हटलं. 

यवतमाळमध्ये पत्रकारांनी मनसे-भाजपा युतीवर प्रश्न विचारला तेव्हा आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, उत्तर प्रदेशातील २ टप्प्यानंतर मनसेला सोबत घेतले जाईल अशी भाजपाकडून चर्चा आम्हाला ऐकायला आलीय असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत आदित्य ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही जाहीर केलेत. महायुतीत ईडी, सीबीआय, भ्रष्टाचारांची गँग आहे तिथे जागावाटपावरून बोली सुरू आहे. मिंदे गटातील ४-५ उमेदवार बदलणार अशी चर्चा आहे. अजून पुढे अनेक गोष्टी ऐकायला मिळतील. आमची निष्ठा महाराष्ट्राची आणि देशाची आहे. देशहित, महाराष्ट्र हित बघून आम्ही पुढे चाललोय असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय आम्ही सर्वसामान्यातले आहोत. आमच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना तरुण मंडळींना सोबत घेऊन वरिष्ठांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललोय. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना-राष्ट्रवादीबाबत जो निर्णय दिला तो पाहिला तर देशात संविधान बदलण्याचे संकेत मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बाजूला ठेवून भाजपाचे संविधान देशावर लादायचं आहे. हे आम्ही करून देणार नाही. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक झाली. Join किंवा Jail अशी ऑफर येत आहे. त्यातून जगभरात भारताची बदनामी होतेय. ईडी, सीबीआय कारवाईतून देश बदनाम होतोय. त्यामुळे इंडिया आघाडीची वज्रमूठ बाहेर आली आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी भाजपावर केली. 

दरम्यान, आताच मिंदेंनी दिलेले उमेदवार बदलायला सांगितले आहेत, त्यातून पुढे ४० गद्दारांनी विचार करावा. महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं आहे. राज्यात असं राजकारण कधीच झालं नव्हतं, जातीधर्मात भांडणं लावली जातेय. पक्ष पोडणे, कुटुंब फोडणे यातून महाराष्ट्रात मिळवलं काय? अडीच वर्षात एकही उद्योग राज्यात आणला नाही. शेतकरी त्रस्त आहे. मग हे राजकारण कुणासाठी आणलं? आमची राज्यासाठी जी तळमळ आहे, देशात जे राजकारण सुरू आहे. ५० वर्षापूर्वी जे झाले तो इतिहास आहे, भविष्यावर बोलणार की नाही. काँग्रेसनं काय केले यावर प्रचार सुरू आहे. आपण ज्या पदावर आहोत तिथे पुढे देशासाठी काय करणार याचा विचार करायला हवा असं सांगत आदित्य ठाकरेंनी काँग्रेसवरील आरोपांना उत्तर दिले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेMNSमनसेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी