शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मैत्रीपूर्ण लढतीचं जाहीर करू द्या, मग...; काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:46 IST

loksabha election 2024: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे-शरद पवार यांचा पक्षातील वाद उफाळले आहेत. त्यात आता काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या तयारीत असल्याची बातमी आल्यानंतर राऊतांनी त्यावरून निशाणा साधला. 

मुंबई - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) काँग्रेस हा समंजस पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढत ही विरोधकांना मदत करण्यासाठी केली जाते अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवरून इशारा दिला आहे. महाविकास आघाडीत अद्यापही ४- ५ जागांवर तिढा असून यातील काही जागांवर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून या जागांवर मैत्रीपूर्ण लढा देऊ अशी भूमिका घेण्यात आली. काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेवर संजय राऊत यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. 

संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसनं जाहीर करू द्या, मग उत्तर प्रदेश, बिहार आणि संपूर्ण महाराष्ट्रात ४८ जागा आहेत त्यावरही मैत्रीपूर्ण लढती करायच्या का? काँग्रेस हा समजूतदार पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होते हे त्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही विरोधकांना मदत करण्यासाठी केली जाते असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत रविवारी आम्ही दिल्लीत जाणार असलो तरी तिथे जागावाटपावर चर्चा होणार नाही असंही राऊतांनी स्पष्ट सांगितले. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सांगली, भिवंडी, मुंबई दक्षिण मध्य तसेच इतर २ जागांवर चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून मविआच्या बैठकीत या जागांवरून चर्चा सुरू आहे. सांगलीच्या जागेवर ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचसोबत मुंबई दक्षिण मध्य जागेवर अनिल देसाईंना उमेदवारी दिली. त्यावरून काँग्रेसचे नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. 

सांगली, भिवंडीसह ५ जागांवरील दावा काँग्रेस सोडण्यास तयार नाही. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारी काँग्रेस करत आहे. त्यामुळे जर अशा मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर त्यातून महाविकास आघाडीतील मतांचे विभाजन होईल अशी शक्यता ठाकरे गटाच्या नेत्यांनी बोलून दाखवली. त्यातूनच राऊतांनी काँग्रेसला असा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे