शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

मैत्रीपूर्ण लढतीचं जाहीर करू द्या, मग...; काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:46 IST

loksabha election 2024: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे-शरद पवार यांचा पक्षातील वाद उफाळले आहेत. त्यात आता काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या तयारीत असल्याची बातमी आल्यानंतर राऊतांनी त्यावरून निशाणा साधला. 

मुंबई - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) काँग्रेस हा समंजस पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढत ही विरोधकांना मदत करण्यासाठी केली जाते अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवरून इशारा दिला आहे. महाविकास आघाडीत अद्यापही ४- ५ जागांवर तिढा असून यातील काही जागांवर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून या जागांवर मैत्रीपूर्ण लढा देऊ अशी भूमिका घेण्यात आली. काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेवर संजय राऊत यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. 

संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसनं जाहीर करू द्या, मग उत्तर प्रदेश, बिहार आणि संपूर्ण महाराष्ट्रात ४८ जागा आहेत त्यावरही मैत्रीपूर्ण लढती करायच्या का? काँग्रेस हा समजूतदार पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होते हे त्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही विरोधकांना मदत करण्यासाठी केली जाते असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत रविवारी आम्ही दिल्लीत जाणार असलो तरी तिथे जागावाटपावर चर्चा होणार नाही असंही राऊतांनी स्पष्ट सांगितले. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सांगली, भिवंडी, मुंबई दक्षिण मध्य तसेच इतर २ जागांवर चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून मविआच्या बैठकीत या जागांवरून चर्चा सुरू आहे. सांगलीच्या जागेवर ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचसोबत मुंबई दक्षिण मध्य जागेवर अनिल देसाईंना उमेदवारी दिली. त्यावरून काँग्रेसचे नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. 

सांगली, भिवंडीसह ५ जागांवरील दावा काँग्रेस सोडण्यास तयार नाही. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारी काँग्रेस करत आहे. त्यामुळे जर अशा मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर त्यातून महाविकास आघाडीतील मतांचे विभाजन होईल अशी शक्यता ठाकरे गटाच्या नेत्यांनी बोलून दाखवली. त्यातूनच राऊतांनी काँग्रेसला असा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे