शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचं संकल्पपत्र कागदी नसून ती मोदींची गॅरंटी; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:27 IST

lok sabha Election 2024: भाजपा देशात सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा आरोप सातत्याने केला जातोय, त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. त्याचसोबत भाजपाच्या संकल्पपत्रातून पुढील ५ वर्षात काय करणार याबाबत थोडक्यात सांगितले

नागपूर - Devendra Fadnavis on Congress ( Marathi News ) २०१९ ला मोदी सरकारने जो जाहीरनामा दिला होता, त्यात जी ७५ आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण करण्यात आली आहेत. भाजपाचं संकल्पपत्र हे कागदी नसून ती मोदींची गॅरंटी आहे. देशातील सर्व घटकांचा विकास करण्याचा संकल्प भाजपाचा आहे. देशभरातील १५ लाख लोकांच्या सूचनेतून भाजपाचं संकल्पपत्र तयार करण्यात आलं आहे. मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास असून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आणि देशात येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसनं राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल, कर्नाटक यासारख्या राज्यात एकही गोष्ट जाहीरनाम्यातील केली नाही. काँग्रेससाठी जाहीरनामा हा कागद आहे आणि पण आमच्यासाठी जाहीरनामा हा संकल्प आहे. काँग्रेसनं दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नाहीत. राहुल गांधी स्वत: वाचत नाहीत त्यांना कुणीतरी फिड करत असते. काँग्रेसचा जाहीरनामा हा फेल जाहीरनामा आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान होते, म्हणून चहा विकणारा देशाचा पंतप्रधान झाला. जेव्हा मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे घेतली तेव्हा भारताच्या संविधानासमोर हात जोडून ते स्वीकारले. संविधान बदलण्याचा विचार आजपर्यंत कुणी केला नाही. संविधानातील मूळ गाभा बदलण्याचा अधिकार संसदेला नाही हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले आहे. काँग्रेसकडे विश्वासार्हता नाही, कुठलेही विकासाचा मुद्दा नाही. त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करतंय असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दरम्यान, अग्निवीर योजना रद्द करणं म्हणजे देशाला धोक्यात टाकणं आहे. देशातील सैन्य युवा असलं पाहिजे, जे इतर देशात आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात अग्निवीर भरती झालेले आहेत आणि ते देशाच्या सीमेवर लोकांचं रक्षण करत आहेत असं फडणवीसांनी सांगितले. 

भाजपाच्या संकल्पपत्रात काय आहे?

  • पुढील ५ वर्षात पंतप्रधान सूर्यघर योजनेतून १ कोटी घरांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्यात येईल. त्यातून या कुटुंबाचं वीजदर जवळपास शून्य करण्यात येईल. 
  • मुद्रा योजनेतून ६० टक्के महिलांना कर्ज मिळालं. महिला, तरुणांना कुठल्याही व्याजविना दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठीही संकल्पपत्रात मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. 
  • पीएम किसान निधीतून पुढील ५ वर्षही ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. पीकविमा आणखी मजबूत करण्यात येणार आहे. प्रमुख पीकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे. पुढील काळातही भरघोस वाढ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 
  • भाजीपाला नासंवत असल्याने त्याचा साठा करण्यासाठी योग्य यंत्रणा उभारण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा. मागच्या ५ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन देशभरात सिंचनाखाली आली. पुढील काळात सिंचन क्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. 
  • देशात पहिल्यांदा १०० टक्के कृषी सॅटेलाईट सोडण्यात येणार आहे. वातावरणाच्या बदलामुळे जो परिणाम होतोय त्यातून कृषी क्षेत्राला मुक्ती मिळेल. त्यातून पिकांचे निरिक्षणही होईल. कृषी क्षेत्रात डिजिटल सुविधा आणखी सुकर करण्यात येईल. 
  • पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया, पेपरफुटीविरोधात अतिशय कडक कायदा याचाही संकल्पपत्रात उल्लेख आहे. देशात स्टार्टअप मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यातून रोजगारनिर्मिती होतेय. या क्षेत्राला विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येणार आहे. 
  • उत्पादन क्षेत्रावर भर दिला जात आहे. भारत सर्व क्षेत्रात जागतिक खेळाडू म्हणून चीन खालोखाल पुरवठादार म्हणून विकसित होतोय. त्यामुळे उत्पादन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येणार आहे. 
  • किमान वेतनात वाढ करण्यासाठी धोरण आखणार, त्यातून असंघटित कामगारांना मोठा फायदा होणार आहे. मागच्या काळात १ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. 
  • महिला बचत गटासाठी ८ लाख कोटी रुपये दिलेत. महिला बचत गटाची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी साखळी उभारण्यात येत आहे. सार्वजनिक बसस्टँड, रेल्वे स्थानका याठिकाणी बचत गटातील उत्पादने विक्री केंद्र उभारण्यावर भर देण्यात येत आहे. 
  • रेल्वे प्रवाशांसाठी जी वेटिंग लिस्ट असते ती यापुढे राहणार नाही अशाप्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे. सहजपणे प्रवाशांना रेल्वे तिकिट उपलब्ध होईल. पुढील ५ वर्षात भारतातील सर्व रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यात येईल. 
  • प्रादेशिक दळणवळणासाठी रेल्वेचा विस्तार करण्यात येणार आहे. १३ हजारापेक्षा जास्त स्टेशनचा विकास करण्यात येणार आहे. सर्व भागात या ट्रेन्स पोहचवण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनचा विस्तार वाढवण्यात येणार आहे. रेल्वे संबंधित सर्व सेवा एका APP च्या माध्यमातून देण्यात येतील. 
  • भारतातील साहित्य आणि संस्कृती हे विदेशी भाषांमध्ये आणून जगभरात पोहचवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्रैवार्षिक सांस्कृतिक संमेलनाच्या आधारे जगभरात भारतीय संस्कृतीचं प्रचार, प्रसार करण्यात येईल. स्मारकांचे जिर्णोद्धार आणि जतन करण्याचं काम केले जाणार आहे. पर्यटनावर विशेष भर देऊन त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
  • पुढील काळातही भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू राहणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये देशाने काय काय केले पाहिजे अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत. संपूर्ण देशात समान नागरिक कायदा आणेल असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात लिहिलं आहे. हाच समान नागरी कायदा देशात लागू करण्यात येईल. त्यातून सगळ्यात जास्त अधिकार महिलांना मिळणार आहे. 
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४