शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 12:32 IST

MNS in Mahayuti: मनसेचा खासदार राज्यसभेत जाणार असल्याचं बोललं जाते. परंतु अद्यापही मनसे-भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांनी युतीबाबत ठोस भूमिका मांडली नाही.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपा-मनसे यांच्यात युतीची शक्यता वर्तवली जात आहे. मिशन ४५ प्लससाठी भाजपाने नव्या मित्रांना सोबत घेण्याची रणनीती आखली आहे. त्यात राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी देण्याची चर्चा पुढे आली आहे. बाळा नांदगावकर, जे राज ठाकरेंसोबत मनसेच्या स्थापनेपासून आहेत त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकते. तर अमित ठाकरेंनाही राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घेण्याची चर्चा सुरू आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त होईल. नुकतेच राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत बैठक झाली. तेव्हापासून मनसे-भाजपा युतीच्या चर्चेला जोर आला. या बैठकीनंतर राज्यात राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बैठक झाली. लोकसभेसाठी भाजपा मनसेला किती जागा देणार याबाबत ठोस माहिती नसली तरी अचानक घडणाऱ्या या घडामोडींमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत असं भाजपाच्या नेत्याने सांगितले. 

राज्यात मिशन ४५ प्लस यासाठी भाजपाला मनसेच्या पाठिंब्याचीही आवश्यकता आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत फूट पडली, ५५ पैकी ४४ आमदार शिंदेंसोबत आले. १३ खासदारही शिंदेंच्या गटात आहेत. मात्र शिंदेसोबत मतदार किती असावेत याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शिंदेंसोबत आमदार, खासदार असले तरी मतदार उद्धव ठाकरेंसोबत असल्याची भीती भाजपा नेत्यांना वाटते. त्यामुळे मिशन ४५ प्लस हे महायुतीसाठी कठीण बनलं आहे. त्यात राज ठाकरे यांच्या मनसेने मागील लोकसभा निवडणूक लढली नाही. परंतु विधानसभा निवडणुका पाहिल्या तर केवळ मुंबईत त्यांच्याकडे ५ लाखाहून अधिक मतदार आहेत. 

दरम्यान, भाजपा-मनसे यांच्यातील युती ही जवळपास निश्चित आहे. परंतु मनसेला नेमकं युतीत किती जागा मिळणार, अथवा मिळणार नाहीत हे दोन्ही पक्षातील कुणीही अधिकृतरित्या स्पष्ट केले नाही. त्यामुळे या चर्चा आणि तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४MNSमनसेBJPभाजपाBala Nandgaonkarबाळा नांदगावकरRaj Thackerayराज ठाकरेAmit Shahअमित शाह