शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

जाती-पातीच्या राजकारणावर राष्ट्रवादच भारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 19:08 IST

देशात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत सर्वाधिक प्रमाणात जाती-पातीचे राजकारण होत आले आहे. परंतु, या लोकसभा निवडणुकीत जातीची समीकरणे पूर्णपणे विफल ठरल्याचे चित्र आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजयाची नोंद केली. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून जनतेने जाती-पातीच्या राजकारणाला फाटा दिल्याचे दिसून आले.

देशात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत सर्वाधिक प्रमाणात जाती-पातीचे राजकारण होत आले आहे. परंतु, या लोकसभा निवडणुकीत जातीची समीकरणे पूर्णपणे विफल ठरल्याचे चित्र आहे. या दोन राज्यांत भाजप नेत्यांनी ज्याप्रमाणे विजय मिळवला, त्यावर जाणकारांच्या मते जनता आता जातीच्या राजकारणातून बाहेर आल्याचे दिसून येते.

उत्तर प्रदेशातील ८० पैकी ६३ आणि बिहारमधील ४० पैकी ३७ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजयाची नोंद केली आहे. भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने राष्ट्रवादाच्या आणि काही प्रमाणात विकासाच्या मुद्दावर या निवडणुकीला सामोरे गेला. यासह भाजपने नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा चेहरा समोर ठेवला. त्यामुळे भाजपला ऐतिहासिक विजयाची नोंद करता आली.

वास्तविक पाहता, उत्तर प्रदेशात मोदींना रोखण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षांनी जातीच समीकरणे बसवून युती केली. यामध्ये मुस्लीम, यादव आणि दलित मतांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी खास प्रयत्न केले. परंतु, बालाकोटनंतर करण्यात आलेले एअरस्ट्राईक आणि भाजपने पाकिस्तानविरुद्ध घेतलेला आक्रमक पावित्रा जातीपातीच्या राजकारणाला फाटा देणारा ठरला.

दरम्यान २००४ प्रमाणे निकाल उलट लागतील अशी आशा विरोधकांना होती. परंतु त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाचे नियोजन आणि सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केलेले विश्वास यामुळे विरोधकांच्या आशा सत्यात येऊ शकल्या नाही.

महाराष्ट्रात जातीच्या राजकारणाचा फायदाच

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पक्षाने गेल्या वेळपेक्षा मोठे यश मिळावले. राज्यात युती तब्बल ४१ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी यांनी युती करत वंचित बहुजन आघाडी तयार केली होती. तसेच सर्वच्या सर्व ४८ जागा लढवल्या. मात्र वंचितचे उमेदवार औरंगाबाद वगळता, भाजपसाठी फायदेशीरच ठरल्या विरोधकांचे म्हणणे आहे. कारण काँग्रेसला मिळणारी दलित आणि मुस्लीम मते बहुतांशी प्रमाणात वंचितकडे फिरली. याचा लाभ भाजपलाच झाला. औरंगाबादमधून वंचितचे उमेदवार इम्तियाज जलील विजय झाले.

प्रादेशिक अस्मिताही फिकी

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी केली आहे. डाव्यांचा पाडाव केल्यानंतर बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे एकतर्फी वर्चस्व पाहायला मिळाले. यासाठी येथील प्रादेशिक अस्मिता देखील महत्त्वाची होती. मात्र बंगालमधील जनतेने हा मुद्दा बाजुला सारून भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकली. त्यामुळे जाती-पातीच्या राजकरणासह प्रदेशिक अस्मितेवर देखील राष्ट्रवादाचा मुद्दा भारी पडला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी