शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...तर घरी बसलो असतो, पण मतं मागितले नसते : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 12:31 IST

उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या योजनांच काय झालं याविषयी तुम्ही बोलणे अपेक्षीत होते. परंतु, शहीद जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची अत्यंत वाईट वेळ तुमच्यावर आल्याचे मुंडे म्हणाले.

पुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात अनेक कारगील युद्ध झाले. परंतु, त्यांनी कधी जवानांच्या शौर्यावर किंवा त्यांच्या बलिदानावर मतं मागितले नाही. मात्र मोदीजी तुम्ही पुलवामामधील शहीद जवांनांच्या बलिदानावर खुशाल राजकारण करत आहेत. त्यापेक्षा घरी बसा अशी टीका विरोधपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

तुम्ही देशाचे चौकीदार असल्याचे म्हणता. पण लोक आता तुम्हाला 'चौकीदार चोर' म्हणत आहेत. उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या योजनांच काय झालं याविषयी तुम्ही बोलणे अपेक्षीत होते. परंतु, शहीद जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची अत्यंत वाईट वेळ तुमच्यावर आल्याचे मुंडे म्हणाले.

इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करूनही जनतेत सैनिकांच्या शौर्यावर मत मागितले नाही. अटलजींनी देखील कधी जनतेत जावून शहीद जवानांच्या नावे मते देण्याचे आवाहन जनतेला केले नाही. मोदीजी मी तुमच्या जागी असतो, तर घरी बसलो असतो, परंतु, शहीदांच्या नावे मतं मागितले नसते, असा टोलाही मुंडे यांनी यावेळी लगावला.

यावेळी मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने अमित शाह यांना अफजल खान संबोधले होते. तसेच मराठी माणसाला अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याचे आवाहन केले होते. मात्र तुम्ही गुजरातमध्ये जावून अफजल खानाला मुजरा करून आल्याची टीका यावेळी मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मोदींनी, जशोदाबेनच काय झालं, ते सांगवे

वर्ध्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर वैयक्तीक टीका केली. पवार साहेबांच्या कुटुंबापर्यंत मोदी आले. त्यांच्या घरात कलह सुरू असल्याचे म्हटले. अशा वेळेस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तुमच्या घरापर्यंत आल्यास काही वावगं वाटायला नको, असं मुंडे यांनी सांगितले. तसेच पवार साहेबांच सोडून द्या मोदी साहेब जशोदाबेनचं काय झालं होत, तेवढं सांगा, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी