शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

Lok Sabha Election 2019 : 'चंद्रपूर'चा गड नक्की होता तरी कुणाचा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 1:01 PM

मागील तीन निवडणुकांत हा मतदार संघ भाजपकडे असून चंद्रपूरचा गड नेमका आहे तरी कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई - राज्यातील चंद्रपूर मतदार संघाच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला होता. अखेरीस काँग्रेसने चंद्रपूरमधील पेच दूर करत विनायक बांगड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या ताब्यात असलेला चंद्रपूर मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा. परंतु, मागील तीन निवडणुकांत हा मतदार संघ भाजपकडे असून चंद्रपूरचा गड नेमका आहे तरी कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१९५२ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे अब्दुलभाई मुल्ला तहेराली विजयी झाले होते. त्यांच्यानंतर १९५७ मध्ये व्ही.एन. स्वामी निवडून आले. परंतु, १९६२ मध्ये लाल शाम शाह यांनी अपक्ष विजय मिळवला. शाह यांच्या राजीनाम्यानंतर १९६४ मध्ये येथे झालेल्या फेर निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या जी.एम. कन्नमवार यांनी विजय मिळवला. तर १९६७ मध्ये के.एम. कौशिक अपक्ष निवडून आले. त्यानंतर १९७१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे अब्दुल शफी निवडून आले. परंतु काँग्रेसच्या विजयाची परंपरा भारतीय लोकदलचे राजे विश्वेश्वर राव यांनी खंडित केली. त्यानंतर काँग्रेसकडून शांताराम पोटदुखे यांनी चंद्रपूरमधून १९८०, १९८४, १९८९ आणि १९९१ मध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे चंद्रपूर काँग्रेसचा गड मानला जात होता.

दरम्यान १९९६ मध्ये हंसराज अहिर यांनी काँग्रेसचा गड असलेला चंद्रपूर मतदार संघ हिसकावला. मात्र १९९८ आणि १९९९ मध्ये काँग्रेसने येथे पुन्हा कमबॅक केले. काँग्रेसच्या नरेश पुगलीया यांनी दोन्ही वेळा विजय मिळवला. परंतु, २००४ मध्ये भाजपने हंसराज अहिर यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. अहिर यांनी त्यावेळी विजय मिळवला. तसेच २००९ आणि २०१४ मध्ये देखील हा मतदार संघ भाजपला मिळवून दिला. त्याचे फळ त्यांना २०१४ मध्ये मिळाले असून मोदी सरकारमध्ये हंसराज अहिर यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री पदी संधी देण्यात आली होती.

शिवसेना आमदार धानोरकर होते इच्छूक

चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र काँग्रेसकडून विनायक बांगड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक पाहता आमदार धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांना तिकीट मिळाले नाही. आता चंद्रपूरमधून हंसराज अहिर यांना विनायक बांगड यांचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीतच चंद्रपूर गड कुणाचा हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसcongressकाँग्रेस