शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

अशोक चव्हाणांमुळे राज्यातील काँग्रेसची झोळी रिकामी होता-होता राहिली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 12:03 IST

काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली. तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड ढळला. राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी करताना स्पष्ट बहुमत मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपप्रणीत एनडीएने देशात ३५० हून अधिक जागा जिंकल्या. यामध्ये काँग्रेससह विरोधकांची वाताहत झाली. राज्यातही काँग्रेसला मोठे नुकसान झाले. २०१४ मध्ये दोन जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाला यावेळी मात्र एक जागा मिळाली. राज्यात एक जागा आल्यामुळे काँग्रेस भूईसपाट होण्यापासून काही प्रमाणात वाचले. यात देखील अशोक चव्हाणांचाच हात असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली. तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड ढळला. राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला. तसेच केंद्रीयमंत्री आणि विजयाची हॅटट्रीक करणारे हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली.

दरम्यान शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले धानोरकर यांना काँग्रेसने डावलले होते. परंतु, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची एक ऑडिया क्लीप त्याचवेळी व्हायरल झाली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. अखेरीस चंद्रपूरचा उमेदवार बदलून धानोरकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली. धानोरकरांनी देखील काँग्रेसचा विश्वास सार्थ ठरतव विजय मिळवला.

२०१४ मध्ये काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली दोन जागा जिंकता आल्या होत्या. नांदेडमधून खुद्द अशोक चव्हाण होते. तर हिंगोलीतून राजीव सातव विजयी झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसchandrapur-pcचंद्रपूरnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा