शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

अशोक चव्हाणांमुळे राज्यातील काँग्रेसची झोळी रिकामी होता-होता राहिली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 12:03 IST

काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली. तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड ढळला. राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी करताना स्पष्ट बहुमत मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपप्रणीत एनडीएने देशात ३५० हून अधिक जागा जिंकल्या. यामध्ये काँग्रेससह विरोधकांची वाताहत झाली. राज्यातही काँग्रेसला मोठे नुकसान झाले. २०१४ मध्ये दोन जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाला यावेळी मात्र एक जागा मिळाली. राज्यात एक जागा आल्यामुळे काँग्रेस भूईसपाट होण्यापासून काही प्रमाणात वाचले. यात देखील अशोक चव्हाणांचाच हात असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली. तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड ढळला. राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला. तसेच केंद्रीयमंत्री आणि विजयाची हॅटट्रीक करणारे हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली.

दरम्यान शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले धानोरकर यांना काँग्रेसने डावलले होते. परंतु, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची एक ऑडिया क्लीप त्याचवेळी व्हायरल झाली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. अखेरीस चंद्रपूरचा उमेदवार बदलून धानोरकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली. धानोरकरांनी देखील काँग्रेसचा विश्वास सार्थ ठरतव विजय मिळवला.

२०१४ मध्ये काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली दोन जागा जिंकता आल्या होत्या. नांदेडमधून खुद्द अशोक चव्हाण होते. तर हिंगोलीतून राजीव सातव विजयी झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसchandrapur-pcचंद्रपूरnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा