शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

मोदी, शहा नको, कुणीही येऊ द्या : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 18:38 IST

 मोदी, शाह यांनी देश अक्षरश: विकायला काढला आहे. या दोघांनाही घरी बसवलं पाहिजे. परत मोदी पुन्हा सरकार मध्ये आलेत तर देश हुकुमशाहीकडे जाईल अशी भितीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता सर्वाधिक चर्चेत असलेले राज ठाकरे यांच्या सभा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. आपल्या प्रत्येक सभेत राज ठाकरे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोनच व्यक्ती देश चालवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्या सभांमुळे निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. याबाबत राज ठाकरेंना माध्यमांनी विचारले असता, मला मोदी आणि अमित शहा नको मग याचा फायदा कुणलाही होऊ द्या असे त्यांनी सांगितले. मोदी, शाह यांनी देश अक्षरश: विकायला काढला आहे. या दोघांनाही घरी बसवलं पाहिजे. परत मोदी पुन्हा सरकार मध्ये आलेत तर देश हुकुमशाहीकडे जाईल अशी भितीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. आपल्या ठाकरे शैलीत त्यांनी राज्यातील युतीचा सुद्धा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री आहे. भाजप-शिवसेना दोन्हीही पैशांसाठी आणि सत्तेसाठी लाचार आहेत. मी आधीच सांगितले होते युती होणार आहे. जर युती केली नसती तर शिवसेनेत उभी फूट पडली असती,असही राज यांनी सांगितले. 

राज यांच्याकडून पुराव्यानिशी करण्यात येणारी टीका सत्ताधारी भाजपसाठी निवडणुकीच्या तोंडावर अडचणीची ठरत आहे. मात्र नरेंद्र मोदीं यांच्या विरोधात मनसेच्या इंजिनचा वेग वाढतच आहे. राज यांच्या टीकामुळे भाजपचे किती नुकसान होईल, हे पाहण्यासाठी निवडणूक निकालाचीच वाट पाहावी लागणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाShiv Senaशिवसेना