शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

सरसकट कर्जमाफीचं आघाडीचं आश्वासन, तर भाजपकडून चकार शब्द नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 12:54 PM

विरोधकांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात येत असताना भाजपकडून कर्जमाफीसंदर्भात चकार शब्द उच्चारला जात नसल्याचे सध्याचे प्रचारातील चित्र आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - भारतीय जनता पक्षाने मागील कार्यकाळात केलेली तत्वत: शेतकरी कर्जमाफी बोटावर मोजण्याइतपच शेतकऱ्यांना मिळाली आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळून निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नजर या निवडणुकीत सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाकडे लागली आहे. मात्र ज्यांना सत्ता येण्याची शाश्वती आहे त्यांच्याकडून कर्जमाफीसंदर्भात चकार शब्द उच्चारला जात नसून विरोधकांकडून मात्र सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे.

भाजप-शिवसेनेच्या मागील कार्यकाळात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. कधी नव्हे तो राज्यात शेतकरी संप पुकारण्यात आला होता. त्यावेळी राज्यातील स्थिती सत्ताधारी भाजपच्या हाताबाहेर गेली होती. तर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काही निकष लावून कर्जमाफीची घोषणा केली होती.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी अनेक निकष लावण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक गावातून बोटांवर मोजण्याइतपतच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. तरी देखील भाजप आणि शिवसेनेकडून कर्जमाफी दिल्याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली होती. परंतु, काही काळातच शिवसेनेने तुरळक शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफी योजनेवर नाराजी व्यक्त करत स्वत:ला वेगळं करून घेतलं. तसेच भाजपला धारेवर धरण्यास सुरुवात केली. सत्तेत असूनही शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे कर्जमाफी योजना शेतकऱ्यांपर्यंतच पोहचली नसल्याचे समोर आले.

आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीतही कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येणार असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे. तरी देखील सरसकट कर्जमाफीसंदर्भात भाजपकडून चकार शब्द काढला जात नाही. तर शिवसेनेकडून अधुनमधून कर्जमाफीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करण्यात येते.

हाच मुद्दा हेरून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे. सत्ता आल्यास, पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सरसकट कर्जमाफी करू, असं आश्वासन आघाडीकडून देण्यात आले आहे. विरोधकांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात येत असताना भाजपकडून कर्जमाफीसंदर्भात चकार शब्द उच्चारला जात नसल्याचे सध्याचे प्रचारातील चित्र आहे.