शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आता राहुल गांधींना एकदा संधी देऊन बघू या - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 5:43 AM

नरेंद्र मोदी नशीबवान आहेत की त्यांना पंतप्रधानपद मिळाले. अनेक इच्छुक राजकारणातून निघून गेले, पण त्यांना हे पद मिळाले नाही.

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यापासून आपल्यासमोर कधीच पर्याय नव्हता. महात्मा गांधींनी ठरविले म्हणून नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा लोकांना पर्याय होता का? मग आत्ताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला. आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या. खड्ड्यात घालतील किंवा देशाचे चांगलेदेखील करून दाखवतील. त्यांना संधी तर देऊन बघू या, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रथमच आपला पाठिंबा व्यक्त केला.

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथील सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपवर सडकून टीका केली.

नरेंद्र मोदी नशीबवान आहेत की त्यांना पंतप्रधानपद मिळाले. अनेक इच्छुक राजकारणातून निघून गेले, पण त्यांना हे पद मिळाले नाही. अफाट बहुमत घेऊन आलेला हा पंतप्रधान; पण देशाची पार वाट लावून टाकली. देशाला संकटातून बाहेर काढायचे असेल तर त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. मोदी आणि शहामुक्त भारत व्हावा म्हणून निवडणूक न लढविता मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. येत्या काही दिवसांत राज्यभर आठ ते दहा सभा घेणार. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला. भाजपवाल्यांची कुजबुज सुरू आहे की राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे वापरून घेत आहे. मी इतका वेडा नाही. शिवाय, आत्ता जो निर्णय घेतलाय तो विधानसभेलापण लागू आहे असे अजिबात नाही, असेही राज म्हणाले.

नोटाबंदीच्या आधी भाजपने देशभरात जमिनी घेऊन ठेवल्या. दिल्लीत तर एक लाख ७० हजार स्क्वेअर फुटांचे आॅफिस बांधले. सेवन स्टार आॅफिस बांधायला पैसे कुठून आले, असा सवाल करतानाच नोटाबंदीमुळे नोटाबंदीनंतर देशात ४ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ९९.३% पैसे बँकेत परत आले, म्हणजे नोटाबंदी फसली. त्या वेळी मोदी म्हणाले होते की, जर ५० दिवसांत सगळे सुरळीत नाही झाले तर मला कोणत्याही चौकात हवी ती शिक्षा द्या. मोदी तुम्ही चौक ठरवा, आता शिक्षा द्यायला आम्ही येतो, असे राज म्हणाले.

फसव्या योजना, आधीच्या सरकारच्या योजनांची नावे बदलून रेटायचे उद्योग सुरू आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील, हे मी काही वर्षांपूर्वीच सांगितले होते. आज मोदी आणि शहा तेच करत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर युद्धसदृश्य परिस्थती निर्माण केली. सैनिकांच्या हौतात्म्याचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न मोदींनी चालविला आहे. हे सगळं करणाऱ्या मोदींना प्रश्नही विचारलेले चालत नाही. कोणी प्रश्न विचारला की देशद्रोही ठरविले जाते. ही देशद्रोही ठरविण्याची कल्पना हुकूमशहा एडॉल्फ हिटलरची आहे. त्यानेदेखील त्याला विरोध करणाºया प्रत्येकाला देशद्रोही ठरवले होते. तेच आता मोदी करत आहेत. ही हिटलरची पुनरावृत्ती आहे, असे राज म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी