शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

होऊन जाऊ द्या दूध का दूध ! नामोल्लेख न करता दानवेंचा खोतकरांवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 5:45 AM

भाजप मुस्लिमांच्या विरोधात आहे, हे चित्र रंगवले जात आहे. त्यात तथ्य नाही. काही तुमचे मुद्दे असतील, तसे काही माझेही मुद्दे आहेत. ते सारे दूर ठेवून आपण एका व्यसपीठावर येऊन चर्चा केली पाहिजे.

जालना : भाजप मुस्लिमांच्या विरोधात आहे, हे चित्र रंगवले जात आहे. त्यात तथ्य नाही. काही तुमचे मुद्दे असतील, तसे काही माझेही मुद्दे आहेत. ते सारे दूर ठेवून आपण एका व्यसपीठावर येऊन चर्चा केली पाहिजे. ‘दूध का दूध दूध’ केले पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला.रविवारी शहरातील विविध भागात दानवे यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन झाले. तसेच येथील विघ्ने लॉन्सवर ईदमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत नाव न घेता खोतकरांवर हल्ला चढविला.दानवे म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून आपण राजकारणात आहोत. १९९९ पासून खासदार या नात्याने जालना शहराशी संबंध आला. त्यामुळे गेल्या २० वर्षांत जालना शहराच्या विकासासाठी कोणत्या नेत्याने काय केले, याचा उहापोह सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर बोलावून झाला पाहिले. यावर चर्चा झाली पाहिजे. त्यातूनच कळेल की, जालन्याच्या विकासासाठी कोणी काय केले? तेव्हाच ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल असे थेट आव्हान दानवे यांनी दिले.जालना बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहाराची तुलना त्यांनी थेट लालू प्रसाद यांच्या घोटाळ्यासोबत केली. सध्या बाजार समितीचे सभापती हे अर्जुन खोतकर आहेत. विशेष म्हणजे ही टीका करत असताना बाजार समितीचे उपसभापती आणि त्यांचे चुलत बंधू भास्कर दानवे हे व्यासपीठावर होते.दानवे म्हणाले, मी गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात आहे. आपण साधे आणि गरीब आहोत. गरीब मी दोन्ही अर्थाने आहे. पैशाने देखील गरीबच आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात भाजप आहे, हे चुकीचे आहे. एकदा तुम्ही आणि मी एकत्रीत येऊन विविध मुद्यांवर चर्चा करू असे खुले आवाहनही त्यांनी यावेळी खोतकरांना केले.राजकारणात ‘बाप’दुसऱ्या एका कार्यक्रमात दानवे यांनी राजकारणात आपण सगळ्यांचे ‘बाप’ असल्याचे सांगितले. ‘मातोश्री’वर मला प्रवेश देऊ नये म्हणून स्थानिक नेत्याने प्रयत्न केले ही बाब सर्रास चुकीची आहे. हे नेते परदेशात असताना येथे शिवसेनेचा पाच जिल्ह्यांतील महत्वाचा मेळावा होतो, यावरूनच ते कोणत्या वाटेवर आहेत हे सांगण्याची गरज नसल्याचेही दानवे यांनी सांगितले. 

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवे