शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

काेराेना काळात राज्यात आर्थिक गुन्ह्यांमध्ये घट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 8:52 AM

२०२० मध्ये १२ हजारांहून अधिक गुन्हे दाखल

ठळक मुद्दे२०२० मध्ये १२ हजारांहून अधिक गुन्हे दाखल

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या गेल्या वर्षभराहून अधिक काळात महाराष्ट्रात आर्थिक गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे. काेराेनामुळे वर्षातील बहुतांश कालावधीत राज्यात लाॅकडाऊन आणि कठाेर निर्बंध लागू करण्यात आले हाेते. यादरम्यान गेल्या वर्षी १२ हजारांहून अधिक आर्थिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत आर्थिक गुन्ह्यांमध्ये घट नाेंदविण्यात आली आहे. त्यापैकी १० हजारांहून अधिक गुन्हे हे फसवणुकीचे हाेते. तर दीड हजारांहून अधिक प्रकरणे आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित हाेते. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या एक लाखांहून अधिक प्रकरणांचा तपास अजूनही प्रलंबितच आहे.

राष्ट्रीय गुन्हेगारी रेकाॅर्ड ब्युराेच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण १२ हजार ४५३ आर्थिक गुन्हे दाखल झाले. त्यापैकी १० हजार ७७० गुन्हे फसवणुकीचे हाेते. १६२९ गुन्हे आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित हाेते. केवळ ५३.७ टक्के प्रकरणांमध्येच आराेपपत्र दाखल केले आहे. त्यापूर्वी २०१९मध्ये १५६८६, २०१८मध्ये १४८५४ आणि २०१७मध्ये १३९४१ गुन्हे दाखल झाले हाेते. आतापर्यंतच्या २७ हजार ७०५ प्रकरणांचा तपास अजूनही अपूर्णच आहे. या कालावधीत २ प्रकरणांचा तपास नव्याने सुरू करण्यात आला. तर १३ प्रकरणांचा तपास इतर तपास संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आला. याशिवाय ५ प्रकरणे सरकारनेच मागे घेतली.

४,६२२ प्रकरणात पुरावेच नाहीत 

तब्बल ४ हजार ६२२ प्रकरणे पुराव्यांअभावी बंद करण्यात आली. तर २१४ प्रकरणी अंतिम अहवालच बाेगस हाेता. तसेच ११ हजार ९४६ प्रकरणांचा निपटारा पाेलिसांच्या माध्यमातूनच करण्यात आल्याचे हा अहवाल सांगताे.nराज्यात २०२१ वर्षापूर्वीपासूनचे १ लाख ५ हजार ६३६ प्रकरणे विवध न्यायालयात प्रलंबित हाेती. त्यापैकी १ लाख २६२ प्रकरणे २०२० पासून प्रलंबित आहेत.

विशेष म्हणजे २०२० मध्ये राज्यात आर्थिक गैरव्यवहाराचे एकही प्रकरण समाेर आले नाही. त्यातुलनेत देशभरात १११ प्रकरणांची नाेंद झाली. त्यापैकी सर्वाधिक ९२ गुन्हे उत्तरप्रदेशात दाखल झाले. त्याखालाेखाल तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये प्रत्येक ५५ गुन्हे नाेंदविण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीMONEYपैसाcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र