शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

चासकमान डाव्या कालव्याला गळती

By admin | Updated: January 30, 2017 18:00 IST

चासकमान डाव्या कालव्यातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होतेय

ऑनलाइन लोकमतचासकमान, दि. 30 - चासकमान डाव्या कालव्यातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. अस्तरीकरणाचे काम न झाल्याने पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न येथील शेतकरी विचारीत आहेत.धरणातील पाण्याचा फायदा खेड व शिरूर या तालुक्यांना झाला आहे. गेली अनेक वर्षे डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाते; मात्र ते पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. कारण या कालव्याचे अस्तरीकरणच झालेले नाही. जर पूर्ण क्षमतेने पाणी सोडले, तर कालवाफुटीची शक्यता आहे. वेळोवेळी असे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे कालव्यातून पाणी जरी सोडले, तरी शिरूर तालुक्यात जाण्यासाठी मोठा कालावधी लागतो.यादरम्यानच्या काळात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यामुळे परिसरातील अनेक जमिनींत पाणी साचून त्या नापीक झाल्या आहेत. तर काही भागात घरांच्या भिंती सातत्याने ओलसर असतात. यामुळे अनेक कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच डाव्या कालव्यावर अनेक गावांच्या वस्त्यांना जाणाऱ्या मार्गावर लोखंडी पूल टाकण्यात आले आहेत. मात्र ते नादुरुस्त होऊन धोकादायक बनले आहेत. गरज नसताना सोडले पाणीया वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने जलसाठ्याची परिस्थिती समाधानकारक आहे. रब्बी हंगामात दुसऱ्या आवर्तनाची मागणी नसतानाही पाणी सोडल्याने उन्हाळ्यातील आवर्तनाची मागणी वाढली, तर ते सोडले जाणार आहे. त्यामुळे धरणांतर्गत गावांचा उन्हाळ्यातील पाणी समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. दुसरे आवर्तन सोडू नये, अशी मागणी खेड तालुक्यातील जनतेने करूनही प्रशासनाने हे गांभीर्याने घेतले नाही. आता डाव्या कालव्यातून ५० दिवस पाणी सुरू राहिल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होणार आहे. प्रशासन डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आवर्तनाबाबत निर्णय घेताना विश्वासात घेत नाही. त्यामुळे पाणी नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनाला गांभीर्य नाही.अशोक नाईकरे, सरपंच (कमान)या भागातील वाड्यावस्त्यांना जोडणारे पूल धोकादायक झाले आहे. या पुलाची वेळोवेळी दुरुस्ती करण्याची मागणी करून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.बाळू राऊत, सरपंच (मोहकल) अनेक वर्षांपासून माझ्या शेतात येणाऱ्या पाण्यामुळे पिके घेता येत नाहीत. जमीन नापीक झाली आहे. शासनाने नुकसानभरपाई देणे आवश्यक असताना दिली जात नाही. त्यामुळे शेतकरीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना दुसरीकडे मोलमजुरी करावी लागत आहे.ज्ञानेश्वर विश्वनाथ नाईकरे, शेतकरीपरिसरातील पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज नसताही पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.मारुती सहाने, उपसरपंच (कान्हेवाडी)आवर्तन सोडल्यामुळे ऐन उन्हाळ्यात धरणात पाणी शिल्लक राहते की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कैलास मुन्ना नाईकडे, उपसरपंच (कडधे)पुढील आवर्तन सोडताना चासकमान डाव्या कालव्याचे अस्तरीकर व योग्य नियोजन करून सोडावे.रितेश मुळूक, सरपंच (आखरवाडी)