शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान डाव्या कालव्याला गळती

By admin | Updated: January 30, 2017 18:00 IST

चासकमान डाव्या कालव्यातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होतेय

ऑनलाइन लोकमतचासकमान, दि. 30 - चासकमान डाव्या कालव्यातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. अस्तरीकरणाचे काम न झाल्याने पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न येथील शेतकरी विचारीत आहेत.धरणातील पाण्याचा फायदा खेड व शिरूर या तालुक्यांना झाला आहे. गेली अनेक वर्षे डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाते; मात्र ते पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. कारण या कालव्याचे अस्तरीकरणच झालेले नाही. जर पूर्ण क्षमतेने पाणी सोडले, तर कालवाफुटीची शक्यता आहे. वेळोवेळी असे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे कालव्यातून पाणी जरी सोडले, तरी शिरूर तालुक्यात जाण्यासाठी मोठा कालावधी लागतो.यादरम्यानच्या काळात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यामुळे परिसरातील अनेक जमिनींत पाणी साचून त्या नापीक झाल्या आहेत. तर काही भागात घरांच्या भिंती सातत्याने ओलसर असतात. यामुळे अनेक कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच डाव्या कालव्यावर अनेक गावांच्या वस्त्यांना जाणाऱ्या मार्गावर लोखंडी पूल टाकण्यात आले आहेत. मात्र ते नादुरुस्त होऊन धोकादायक बनले आहेत. गरज नसताना सोडले पाणीया वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने जलसाठ्याची परिस्थिती समाधानकारक आहे. रब्बी हंगामात दुसऱ्या आवर्तनाची मागणी नसतानाही पाणी सोडल्याने उन्हाळ्यातील आवर्तनाची मागणी वाढली, तर ते सोडले जाणार आहे. त्यामुळे धरणांतर्गत गावांचा उन्हाळ्यातील पाणी समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. दुसरे आवर्तन सोडू नये, अशी मागणी खेड तालुक्यातील जनतेने करूनही प्रशासनाने हे गांभीर्याने घेतले नाही. आता डाव्या कालव्यातून ५० दिवस पाणी सुरू राहिल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होणार आहे. प्रशासन डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आवर्तनाबाबत निर्णय घेताना विश्वासात घेत नाही. त्यामुळे पाणी नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनाला गांभीर्य नाही.अशोक नाईकरे, सरपंच (कमान)या भागातील वाड्यावस्त्यांना जोडणारे पूल धोकादायक झाले आहे. या पुलाची वेळोवेळी दुरुस्ती करण्याची मागणी करून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.बाळू राऊत, सरपंच (मोहकल) अनेक वर्षांपासून माझ्या शेतात येणाऱ्या पाण्यामुळे पिके घेता येत नाहीत. जमीन नापीक झाली आहे. शासनाने नुकसानभरपाई देणे आवश्यक असताना दिली जात नाही. त्यामुळे शेतकरीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना दुसरीकडे मोलमजुरी करावी लागत आहे.ज्ञानेश्वर विश्वनाथ नाईकरे, शेतकरीपरिसरातील पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज नसताही पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.मारुती सहाने, उपसरपंच (कान्हेवाडी)आवर्तन सोडल्यामुळे ऐन उन्हाळ्यात धरणात पाणी शिल्लक राहते की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कैलास मुन्ना नाईकडे, उपसरपंच (कडधे)पुढील आवर्तन सोडताना चासकमान डाव्या कालव्याचे अस्तरीकर व योग्य नियोजन करून सोडावे.रितेश मुळूक, सरपंच (आखरवाडी)