शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

काँग्रेसने माफी मागितली तरच विधानसभेला ‘वंचित’सोबत आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 14:50 IST

अण्णाराव पाटील यांचे स्पष्टीकरण; राष्ट्रवादीला गृहीत न धरता केली १४४ जागांची मागणी

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासकीय विश्रामगृहात इच्छुकांच्या मुलाखतीवंचित आघाडीने २८८ मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेतवंचित आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी साखर कारखानदार, माजी मंत्री, आमदार, खासदारांनी मुलाखती दिल्या

सोलापूर  : लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम म्हणून हिणवले. त्याचा सबळ पुरावा द्यावा, अन्यथा आम्हाला ज्या ४२ लाख लोकांनी मते दिली आहेत त्यांची माफी मागा. आघाडी करायची असेल तर काँग्रेसने १४४ जागा सोडाव्यात आणि मुख्यमंत्रीपद वंचित बहुजन आघाडीला द्यावे, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेसकडून तीन दिवसांत उत्तर येणे अपेक्षित आहे, असे वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी शासकीय विश्रामगृहात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अशोक सोनोने, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस आघाडीकडे १२ जागा मागितल्या होत्या, पण त्यांनी आमची दखल घेतली नाही. त्याचा फटका त्यांना बसला. 

वंचित आघाडीने २८८ मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. काँगे्रससोबत आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र यात राष्ट्रवादीला गृहीत धरलेले नाही. राष्ट्रवादीचे नेते आमच्यासोबत आघाडी करायचे म्हणत असतील. पण त्यांच्या नेत्यांनी आम्हाला तसा प्रस्ताव दिलेला नाही. एमआयएमसोबत ९९ टक्के आघाडी होईल. त्याचा निर्णय खासदार असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर घेतील. वंचित आघाडीने काँग्रेस-राष्टÑवादीसोबत जावे, अशी लक्ष्मण माने यांची सक्ती होती. ती फेटाळण्यात आल्यामुळे माने दुरावले आहेत. वंचित बहुजन आघाडीची सोलापुरातील कार्यकारिणी मंगळवारी जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संघाच्या माणसाने मुलाखत दिली- वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी साखर कारखानदार, माजी मंत्री, आमदार, खासदारांनी मुलाखती दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी मुलाखत दिली आहे. तो राजकीय वंचित आहे. पण या सर्वांना उमेदवारी द्यायची की नाही, याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचे सर्व सदस्य घेतील, असेही पाटील यांनी सांगितले. 

जातनिहाय जनगणना करून आरक्षण मर्यादा ठरवा- सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ मोर्चातून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे सांगण्यात येत आहे. याबद्दल अण्णाराव पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण आहे. आपल्याकडेही आरक्षण ६२ टक्क्यांपर्यंत गेले आहे. एखाद्या राज्यात मागास समूहाची संख्या जास्त असेल तर त्या प्रमाणात आरक्षण द्यायला हवे. आरक्षणाची मर्यादा निश्चित करायची असेल तर शासनाने जातनिहाय जणगणना करावी. २०२१ मध्ये होणाºया जनगणनेवेळी जातनिहाय जनगणना करा आणि मर्यादा ठरवा, असेही पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण