शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

कोकणात धूमशान; मराठवाडा दुष्काळमुक्त!

By admin | Updated: September 25, 2016 06:08 IST

कोकणात परतीच्या पावसाचे धूमशान सुरूच असून, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या पावसाने

मुंबई : कोकणात परतीच्या पावसाचे धूमशान सुरूच असून, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या पावसाने कृपादृष्टी केल्याने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. विभागातील बहुतांश बंधारे व धरणांमध्ये दमदार साठा झाल्याने वर्षभराची तहान भागणार आहे. चार दिवसांच्या पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. लातूर जिल्हा टंचाईमुक्त झाला असून, बीड, उस्मानाबाद व परभणीत पावसाने सरासरी ओलांडली आहे.रायगड जिल्ह्यात ११ गावांत पुराचे पाणी शिरले. आंबा, कुंडलिका नद्यांनी पूररेषा ओलांडली. सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच होती. फोंडाघाटमध्ये दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती.मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड हद्दीतील सुकेळी खिंडीतील तसेच चिपळूण परशुराम घाटात दरडी कोसळल्याने शुक्रवारपासून मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. शनिवारी दुपारी तब्बल १० तासांनंतर ही वाहतूक सुरळीत झाली. मात्र सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुन्हा सुकेळी खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यात अनेक ठिकाणी दरडीचा धोका असल्याने त्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश महाड महसूल विभागाने दिले होते. अलिबागजवळील ताडवागळे व वाघोडे येथे बंधाऱ्याचे कठडे वाहून गेल्याने शेतात पाणी गेल्यामुळे शेकडो हेक्टर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर चरी गावातील डिजिटल जि. प. शाळेत पूराचे पाणी घुसल्याने मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून घरे, शेतीच्या नुकसानीसाठी पंचमाना करण्यात येत आहे. त्यानंतर नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होऊ शकेल.उस्मानाबाद जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. पाथरी- माजलगाव रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने परभणी आणि बीड जिल्ह्यांचा संपर्क ठप्प झाला. गेल्या चार दिवसा२ंपासून लातूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. जालना जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९०. ६९ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील दूधना, पूर्णा, कुंडलिका, सीना नद्यांना पूर आला आहे. निम्नदुधनाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचे सातही दरवाजे शनिवारी खुलेझाले. ‘काळम्मावाडी’तूनही विसर्ग वाढविण्यात आला. पंचगंगेची पातळी सतत वाढत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)विष्णुपुरीचे दरवाजे उघडलेशनिवारी नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्प आठ, लिंबोटी सात, तर परभणी जिल्ह्यातील निम्न दूधना प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. लातूर ६३.६६, उस्मानाबाद ४२.९२ तर नांदेड जिल्ह्यात दिवसभरात ५०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. नगरमध्ये चार बळी : नगर जिल्ह्यात विविध दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर खर्डा येथे पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अकोलेतील फोफसंडी येथे वीज पडून कमलाकर काशीनाथ वळे (२०) याचा मृत्यू झाला. धनेगाव (ता. जामखेड) येथे चंद्रहास आत्माराम चव्हाण (५५) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. सोनईत कौतुकी नदीत पोहण्यासाठी गेलेला वैभव संजय पवार हा मुलगा गाळात रुतून मरण पावला, तर सुनील देशमुख (३७) यांचा शेततळ््यात बुडून मृत्यू झाला. जायकवाडीत ६८% जलसाठापाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात २४ तासांत एक टीएमसीने वाढ झाली. धरणातील जलसाठा शनिवारी ६८ टक्क्यांवर पोहोचला. मुसळधार पावसाचा इशारा२५ सप्टेंबरपासून चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.