शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कोकणात धूमशान; मराठवाडा दुष्काळमुक्त!

By admin | Updated: September 25, 2016 06:08 IST

कोकणात परतीच्या पावसाचे धूमशान सुरूच असून, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या पावसाने

मुंबई : कोकणात परतीच्या पावसाचे धूमशान सुरूच असून, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या पावसाने कृपादृष्टी केल्याने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. विभागातील बहुतांश बंधारे व धरणांमध्ये दमदार साठा झाल्याने वर्षभराची तहान भागणार आहे. चार दिवसांच्या पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. लातूर जिल्हा टंचाईमुक्त झाला असून, बीड, उस्मानाबाद व परभणीत पावसाने सरासरी ओलांडली आहे.रायगड जिल्ह्यात ११ गावांत पुराचे पाणी शिरले. आंबा, कुंडलिका नद्यांनी पूररेषा ओलांडली. सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच होती. फोंडाघाटमध्ये दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती.मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड हद्दीतील सुकेळी खिंडीतील तसेच चिपळूण परशुराम घाटात दरडी कोसळल्याने शुक्रवारपासून मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. शनिवारी दुपारी तब्बल १० तासांनंतर ही वाहतूक सुरळीत झाली. मात्र सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुन्हा सुकेळी खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यात अनेक ठिकाणी दरडीचा धोका असल्याने त्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश महाड महसूल विभागाने दिले होते. अलिबागजवळील ताडवागळे व वाघोडे येथे बंधाऱ्याचे कठडे वाहून गेल्याने शेतात पाणी गेल्यामुळे शेकडो हेक्टर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर चरी गावातील डिजिटल जि. प. शाळेत पूराचे पाणी घुसल्याने मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून घरे, शेतीच्या नुकसानीसाठी पंचमाना करण्यात येत आहे. त्यानंतर नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होऊ शकेल.उस्मानाबाद जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. पाथरी- माजलगाव रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने परभणी आणि बीड जिल्ह्यांचा संपर्क ठप्प झाला. गेल्या चार दिवसा२ंपासून लातूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. जालना जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९०. ६९ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील दूधना, पूर्णा, कुंडलिका, सीना नद्यांना पूर आला आहे. निम्नदुधनाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचे सातही दरवाजे शनिवारी खुलेझाले. ‘काळम्मावाडी’तूनही विसर्ग वाढविण्यात आला. पंचगंगेची पातळी सतत वाढत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)विष्णुपुरीचे दरवाजे उघडलेशनिवारी नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्प आठ, लिंबोटी सात, तर परभणी जिल्ह्यातील निम्न दूधना प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. लातूर ६३.६६, उस्मानाबाद ४२.९२ तर नांदेड जिल्ह्यात दिवसभरात ५०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. नगरमध्ये चार बळी : नगर जिल्ह्यात विविध दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर खर्डा येथे पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अकोलेतील फोफसंडी येथे वीज पडून कमलाकर काशीनाथ वळे (२०) याचा मृत्यू झाला. धनेगाव (ता. जामखेड) येथे चंद्रहास आत्माराम चव्हाण (५५) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. सोनईत कौतुकी नदीत पोहण्यासाठी गेलेला वैभव संजय पवार हा मुलगा गाळात रुतून मरण पावला, तर सुनील देशमुख (३७) यांचा शेततळ््यात बुडून मृत्यू झाला. जायकवाडीत ६८% जलसाठापाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात २४ तासांत एक टीएमसीने वाढ झाली. धरणातील जलसाठा शनिवारी ६८ टक्क्यांवर पोहोचला. मुसळधार पावसाचा इशारा२५ सप्टेंबरपासून चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.