शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्रे लिहून प्रसिद्धी मिळविण्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 12:46 AM

कोरेगाव भीमा प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता थेट राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी टीका केली.

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता थेट राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी टीका केली.अलिकडे अशी पत्रे लिहून प्रसिद्धी मिळविण्याची वृत्ती वाढत आहे, असे परखड मत कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे व न्या. मृदुला भाटकर यांच्या खडपीठाने मांडले.याआधीही सतीश गायकवाड यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईची एनआयएकडून चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात केली आहे. त्यापाठोपाठ अब्दुल चौधरी यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली.या याचिकाकर्त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनेक लोकांवर आरोप केले आहेत. शेजारी देशालाही सोडले नाही. अशाप्रकारे कायदेशीर प्रक्रिया डावलून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहिणे, हा दुर्देवी प्रकार आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले.पोलीस ठाण्यात किंवा दंडाधिकाऱ्यांकडे जाऊन कोणत्याही व्यक्ती आपल्या तक्रारीचे निवारण करू शकतात. मात्र थेट पत्र लिहून ते प्रसिद्धी मिळवू इच्छितात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेल्या आरोपींसंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावरील सुनावणी १२ सप्टेंबरला आहे. त्यामुळे आम्ही या याचिकेवरील सुनावणी १७ सप्टेंबरला ठेवत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. गेल्यावर्षी ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेमागे माओवाद्यांचा हात असल्याच्या संशयावरून सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन आणि महेश राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे दुसºया दिवशी कोरेगाव भीमाचा हिंसाचार घडला, असा पोलिसांचा दावा आहे. २८ आॅगस्टला पोलिसांनी आणखी पाच लोकांना अटक केली. त्यात वेर्नोन गोन्साल्विस, अरुण फेरारी, सुधा भारद्वाज व गौतम नवलखा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या पाचही व्यक्ती १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत आहेत. हिंसाचार घडवून केंद्र आणि राज्य सरकार उलथवून टाकण्याचा त्यांचा कट होता, असे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.सुनावणी १७ सप्टेंबरलाअटक आरोपींसंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावरील सुनावणी १२ सप्टेंबरला असल्याने या याचिकेवरील सुनावणी १७ सप्टेंबरला ठेवत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Courtन्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार